संबंधित माहिती
- सप्तशृंगी देवी मंदिर सलग 45 दिवस बंद ठेवणे संशयास्पद
- शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे शरद पवार,अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय
- Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरेंना भेटणार, ही ऑफर देऊ शकतात
- उद्धव ठाकरेंच्या आणखी एका निर्णयाला एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली, आता औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलणार नाही
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा- अमोल मिटकरी
विशाळगडावरील बुरुज ढासळला; वाहतुक बंद
आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नदी- नाले तुडुंब वाहू लागले आहे. परिणामी अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून नदी काठच्या नागरीकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज सकाळी विशाळगडावर जात असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज ढासळला आहे. त्यामुळे लोखंडी जिन्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी वाटेने नागरीकांनी गडावर प्रवेश करावा अशा सूचना शाहुवाडी पोलीसांनी दिल्या आहेत.
विशाळगडाला ऐतिहासिक महत्व आहे. हा प्राचिन किल्ला कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळ्याचा सिध्दी जोहरचा वेडा फोडून विशाळगडाचा आधार घेतला होता. गजापूर या गावापासून सुमारे चार किलो मीटरच्या अंतरावर पावनखिंड आहे. याच पावनखिंडीत नववीर बाजीप्रभू देशपांडे यांनी फक्त 300 मावळ्यांच्या साह्याने पराक्रम मिळविला होता.
