शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (09:26 IST)

कोव्हिडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम - देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
 
कोव्हिडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम सरकारकडून सुरू आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली.
 
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
 
"कमीत कमी अधिवेशन घेण्याचा रेकॉर्ड हे सरकार करतंय. एकूण 7 अधिवेशनं पार पडली. त्याचा एकूण कालावधी 36 दिवस आहे. उद्याचं आठवं अधिवेशन आहे. त्याचा एकूण कालावधी 38 दिवस होता. तर संसदेची अधिवेशनं 69 दिवस चालली. कोव्हिड देशातही आहे," असं फडणवीस म्हणाले.
 
ते म्हणाले, "जे साठ वर्षांत घडलं नाही ते आता घडत आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण याचे प्रश्न पुरवणी मागणीत नसेल तर ते मांडता येणार नाही, शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न, वारकऱ्यांचे प्रश्न गुंवणूक थांबली आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचार सुरू आहे. यावर आम्ही बोलू नये अशी व्यवस्था सरकारने केली आहे."
 
सरकार जे विषय आम्हाला अधिवेशनात मांडू देणार नाही ते प्रश्न आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून मांडू अशी भूमिका भाजपने मांडली आहे. राज्य सरकारने अधिवेशनातून पळ काढला, आहे असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.