संबंधित माहिती
- पालघरमध्ये स्कूटी खड्ड्यात पडली, ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले
- धाराशिव जिल्ह्यात एमयूव्हीचे टायर फुटल्याने भीषण अपघात; तीन महिलांचा मृत्यू
- ठाण्यात चालत्या गाडीत चालकाला हृदयविकाराचा झटका, अपघातात चार जणांचा मृत्यू
- दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कंटेनर डिव्हायडरला धडकला; भीषण आगीत चालकाचा जळून मृत्यू
- कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियनचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू; पुण्यातील घटना
ठाण्यात भीषण अपघात; पुलाच्या रेलिंगला कार आदळल्याने दोघांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यातील नाशिक-मुंबई महामार्गावर रविवारी झालेल्या कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. शहापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, ही घटना आटगावजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार "मयुरेश विनोद चौधरी (२९), जयेश किशन शेंडे (२५) आणि हर्षल पांडुरंग जाधव (२९) हे त्यांच्या कारमधून हळदी समारंभातून परतत होते. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पुलाच्या रेलिंगला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारची डावी बाजू चक्काचूर झाली. मयुरेश आणि जयेशचा जागीच मृत्यू झाला, तर हर्षल गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
तसेच मृतांच्या कुटुंबाने सांगितले की, मयुरेश चौधरीचे २ डिसेंबर रोजी लग्न होणार होते. शहापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Edited By- Dhanashri Naik
