1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
  4. Administration will go door to door and check ration card holders

तर रेशन कार्ड होणार रद्द

केंद्र सरकार
देशात मोठ्या प्रमाणात बनावट पद्धतीने रेशनकार्ड बनवणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना एक मोठा आदेश दिला आहे, ज्या अंतर्गत १८ टक्के पर्यंत रेशनकार्ड रद्द करता येतील.
 
मिळालेल्या माहितीनुसार सरकारी योजनांचे फायदेही हाताबाहेर जाणार आहे. रेशनकार्ड बनवून विविध सरकारी योजनांचा फायदा घेणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने राज्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहे. २२ जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे की ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ रेशन न घेणाऱ्यांचे रेशनकार्ड रद्द करावेत.
देशात सध्या सुमारे २३ कोटी रेशनकार्ड आहे. देशभरात सुमारे १८ टक्के रेशनकार्ड रद्द करता येतील असे मानले जाते. एका अंदाजानुसार, देशात २५ लाखांहून अधिक बनावट रेशनकार्ड आहे. सरकारच्या नवीन आदेशानुसार, ज्यांनी ६ महिन्यांपासून रेशन घेतले नाही त्यांना सर्वात आधी याचा फटका बसेल. हे प्रकरण इथेच थांबणार नाही. प्रशासन घरोघरी जाऊन रेशनकार्डधारकांची तपासणी करणार आहे. ज्यांनी ई-केवायसी केले आहे त्यांची पात्रता पुन्हा तपासली जाईल. अशी माहिती समोर आली आहे. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
अनेक वर्षांनी भेटल्यानंतर प्रेम झाले, महिलेने केले ४८ वर्षीय वर्गमित्राचे अपहरण; मुंबईची घटना