Marathi Biodata Maker

जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीत सुधारणा, मिलिंद नार्वेकरांची बीबीसीला माहिती

Updated: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (20:19 IST)
 
आव्हाड हे सध्या मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना कोव्हिड-19 ची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही जितेंद्र आव्हाड त्यांच्या मुंब्र-कळवा या मतदारसंघात फिरत होते. त्यांच्या आसपासच्या लोकांना कोव्हिड-19 ची लागण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी १३ एप्रिलला घरी स्वत:ला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतलं होतं.
 
त्यावेळी कोरोनाची चाचणी केली आहे आणि ती निगेटिव्ह आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण या क्वारंटाईन काळात आठव्या दिवशीच त्यांना ताप आणि श्वासाचा त्रास जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना तसंच आव्हाड यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला कोव्हिड-19 झाल्याचं समोर आलं होतं.
 
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत
जितेंद्र आव्हाड यांची मुलगी 16 मार्चला स्पेनहून भारतात आली. तिला कोव्हिडची लागण झाल्याचं आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने 15 एप्रिलला दिलं होतं.
 
पण हे वृत्त खोटं असल्याचा दावा आव्हाड यांच्याकडून करण्यात आला होता. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वृत्तवाहिनीवर कारवाई करणार असल्याचंही म्हटलं होतं.
 
"मी पूर्णपणे बरा असून सुरक्षितही आहे. माझी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे," असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी 15 एप्रिलला केलं होतं.
 
त्यांनी कोरोना चाचणी रिपोर्टही ट्वीट केला होता आणि काही चॅनेल्स त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांवर टीकेची झोड उठवली होती.
 
होम क्वारंटाईन असताना १७ एप्रिलला जितेंद्र आव्हाड यांनी भाडेकरूंसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. "भाड्याच्या घरात राहणार्‍या लोकांचं प्रमाण जास्त असून काहींना या कोरोनाच्या परिस्थितीत नियमित भाडे देणे शक्य नाही. यावेळी घरमालकांनी भाडे वसूली किमान ३ महिने पुढे ढकलावी आणि त्यांना घर सोडण्यास सांगू नये," असं आव्हाड यांनी म्हटलं होतं.
 
दरम्यान जितेंद्र आव्हाड सोलापूरचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी आता दत्ता भरणेंना पालकमंत्री करण्यात आलं आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments