Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरेतील कारशेडविना मुंबईतील 'मेट्रो 3' अशक्य : अश्विनी भिडे

Updated: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (12:16 IST)
 
या पार्श्वभूमीवर एसएनडीटी विद्यापीठनं मुंबईतील सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरणाच्या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्यात अश्विनी भिडे बोलत होत्या.
 
'मेट्रो 3'च्या कारशेडवरून मुंबईतील वातावरण तापलंय. कारशेडसाठी 2 हजार 646 झाडे हटवावी लागणार आहेत. वृक्ष प्राधिकरणानं ही झाडं हटवण्यासाठी परवानगी दिली असली तरी पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे.
 
कांजूरमार्गची जमीन मिळण्यात सरकारला अडचणी येत असून, तिथं कारशेड उभारणं किचकट प्रक्रिया आहे. शिवाय, आरेतली झाडं तोडली, तरी त्या बदल्यात 23 हजार 846 झाडं लावली जातील, असेही भिडे यांनी सांगितलं.
 
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मेट्रो 3 साठी झाडं तोडण्याचं समर्थन केलं आहे.
 
"पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखला गेलाच पाहिजे. मात्र, विकासासाठी झाडे तोडणं गरजेचं असल्यास हरकत घेऊ नये. मेट्रो कारशेडला विरोध हे मुंबईकरांचे नुकसान ठरेल." असं गडकरी म्हणाले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments