Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुपारी एक विमान दिल्लीहून काबूलला जाणार

Updated: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (11:22 IST)
 
तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर नियंत्रण मिळवलं आहे. हजारो नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
 
मात्र अफगाणिस्तानमधली परिस्थिती लक्षात घेऊन अनेक देशांनी हवाई सेवा स्थगित केली आहे. काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या एका विमानात जागा मिळवण्यासाठी चाललेली नागरिकांची धडपड या व्हीडिओतून स्पष्ट दिसते.
 
रविवारी तालिबानने राजधानी काबूलवर नियंत्रण मिळवलं. 24 तासानंतर काबूल शहरात गोंधळाचं वातावरण आहे. काबूल विमानतळावर हजारो नागरिकांनी देश सोडण्यासाठी गर्दी केली.
 
देशात लोकशाही ध्वस्त झाल्याबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केलं.
 
बीबीसी प्रतिनिधी कवून खामोश यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, हताश चेहरे, दु:खी मनं यांनी काबूल भरून गेलं आहे. या सगळ्यांना देश सोडून जायचं आहे. त्यांच्या एका हातात फोन आणि दुसऱ्या हाताची नखं दातात धरून आहेत.
 
असंख्य महिलांना भवितव्याविषयी चिंता भेडसावते आहे.
 
मुलींचं बोर्डिंग स्कूल चालवणाऱ्या शबाना बासिज-रसीख यांनी ट्वीट करून म्हटलंय की मला असं वाटतंय की माझ्या डोक्यावर साडेतीन कोटीचा बोजा आहे.
 
अमेरिकन कर्मचारी अफगाणिस्तान सोडत आहेत
अमेरिकन दूतावास तसेच इतर कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानबाहेर आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना हमीद करझाई विमानतळावर आणण्यात आले आहेत. येथून ते काही वेळात अमेरिकेला रवाना होतील.
 
अफगाणिस्तानातून कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर आणण्यासाठी अमेरिकेनी 6 हजार सैनिकांची व्यवस्था केली आहे. असं सांगण्यात येत आहे की अमेरिकन सैनिक काबुल विमानातळाची सुरक्षा करत आहेत.
 
अफगाणिस्तानमधली वेगाने बदलणारी परिस्थिती लक्षात घेऊन, अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत.
 
दूतावासातील तसंच अन्य कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानमधून बाहेर पडता यावं यासाठी अमेरिकेचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments