Marathi Biodata Maker

श्रीनाथजी मंदिर उदयपूर

गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (07:16 IST)
प्राचीन, ऐतिहासिक आणि पारंपरिक राजस्थान राज्याची यात्रा आध्यात्मिक अनुभव घेतल्याशिवाय अपूर्ण आहे. भारत हजारो वर्षे जुनी वेद आणि शास्त्रांची भूमी आहे. ज्यामध्ये समृद्ध पौराणिक भूतकाळ आहे. याकरिता आपण भूतकाळातील मनोरंजक आध्यात्मिक कथांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तसेच उदयपूर जवळ भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिर आहे, जे उदयपूरच्या 49 किमी उत्तर-पूर्व भागात नाथद्वारा मध्ये वसलेले आहे.  
 
श्रीनाथजी मंदिर हे श्रीकृष्णाच्या अर्भक अवताराला समर्पित आहे. बनास नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर अरवली पर्वतरांगांच्या विलोभनीय सौंदर्याने नटलेले आहे. अनेक भाविक आणि प्रवासी नाथद्वाराला भेट देतात आणि मंदिरात त्यांचा आदर करतात. व या मंदीरात सर्वत्र देवाची उपस्थिती अनुभवतात, तसेच स्थापत्यकलेची प्रशंसा करतात.
 
श्रीनाथजी मंदिर इतिहास-
मुघल शासक औरंगजेबाचा मूर्तीपूजेला विरोध होता. त्यामुळे त्याने मंदिरे पाडण्याचे आदेश दिले होते. ही घटना 1660 मधील आहे. जेव्हा औरंगजेबने राजकुमारी चारुमतीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा चारुमतीने स्पष्टपणे नकार दिला. मग राणा राज सिंह यांना निरोप आला. राणा राज सिंह यांनी विलंब न लावता किशनगडमध्ये चारुमतीशी लग्न केले. त्यामुळे औरंगजेबाने राणा राज सिंह यांना आपला शत्रू मानण्यास सुरुवात केली. 
 
तसेच ही दुसरी वेळ होती जेव्हा राणा राज सिंह यांनी औरंगजेबाला खुले आव्हान दिले आणि सांगितले की त्याच्या हयातीत बैलगाडीत ठेवलेल्या श्रीनाथजींच्या मूर्तीला कोणीही हात लावू शकणार नाही. औरंगजेबाला मंदिरात पोहोचण्यापूर्वी एक लाख राजपूतांशी सामना करावा लागेल. त्यावेळी जोधपूरजवळील चौपास्नी गावात श्रीनाथजींची मूर्ती बैलगाडीत होती आणि अनेक महिने चौपास्नी गावात बैलगाडीत श्रीनाथजींच्या मूर्तीची पूजा केली जात होती. तसेच हे चौपास्नी गाव आता जोधपूरचा भाग बनले आहे आणि ज्या ठिकाणी ही बैलगाडी उभी होती तिथे आज श्रीनाथजींचे मंदिर बांधण्यात आले आहे. श्रीनाथजींच्या चरण पादुका कोटापासून 10 किमी अंतरावर ठेवल्या गेल्या आहेत, त्या ठिकाणाला चरणचौकी म्हणून ओळखले जाते. 
 
मंदिर उत्सव आणि अनुष्ठा
श्रीनाथजी मंदिर मध्ये सर्व हिंदू सण उत्साहात साजरे केले जातात. जन्माष्टमी, दसरा, दिवाळी, अन्नकूट, मकरसंक्रांती, प्रबोधिनी एकादशी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याशिवाय क्षेत्रीय उत्सव  हरतालिका, गणगौर देखील उत्साहात साजरे केले जातात. या सणांना श्रीनाथजी यांचा विशेष श्रृंगार व नैवेद्यासाठी प्रसाद तयार केला जातो.
 
मंदिरामध्ये सागर प्रसाद वाटलं जातो. ज्यामध्ये बदाम, साखर आणि तूप असते. याशिवाय मंदिरात रबडी, मसाला दूध, पुदिना चहा, थंडाई, साबुदाणा वडा, ढोकळा, भजे, लिंबू सोडा, गुजराती थाळी, राजस्थानी थाळी आणि बरेच काही चाखता येते.
 
श्रीनाथजी मंदिर उदयपूर जावे कसे?
तुम्ही उदयपूर शहरातून कॅब किंवा बसने सुमारे 1 तासात नाथद्वाराला पोहोचू शकतात. तसेच मारवाड जंक्शन हे पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-दिल्ली मार्गावर वसलेले आहे. मावली पासून आधी नाथद्वारा 15 किमी अंतरावर आहे. कांकरोळी रेल्वे स्थानक नाथद्वारापासून 15 किमी  अंतरावर आहे. नाथद्वारा स्टेशनपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशन ते नाथद्वारापर्यंत अनेक बसेस सेवा उपलब्ध आहे. उदयपूर ते नाथद्वारा हे अंतर 48 किमी आहे. तसेच उदयपूरला देशातील प्रमुख शहरांमधून विमान, रेल्वे किंवा रस्त्याने जाता येते.  

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

प्रीती झिंटाने मुंबईत नवीन घर भाड्याने घेतले, दरमहाचे भाडे जाणून घ्या

फादर्स डे निमित्त वडिलांसोबत एक निवांत आणि आध्यात्मिक प्रवास, भेट द्या महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्री

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी वयाच्या ६०व्या वर्षी बांधली होती लग्नगाठ

'काला हिरण'वरून नवा वाद! गोविंद नामदेवांचे निर्मात्यांवर गंभीर आरोप; सलमानच्या बॉडीगार्डने धमकावल्याचा अमित जानींचा दावा

पुढील लेख
Show comments