Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दलच्या 10 गोष्टी गोष्टी ठाऊक आहेत का?

Updated: बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (12:44 IST)
 
3 मुलाचे निधन - 1842 मध्ये मनूचे लग्न झाशीचे राजा गंगाधर रावांशी झाले. लग्नानंतर मनूचे नाव 'लक्ष्मीबाई' ठेवण्यात आले. 1851 मध्ये ह्यांना एक पुत्र झाले पण 4 महिन्यानंतर त्या मुलाचे निधन झाले.
 
4 पतीचा मृत्यू - नंतर, जेव्हा त्यांच्या पतीची तब्येत ढासळत गेली तेव्हा त्यांना सर्वांनी वारस म्हणून एक मुलगा दत्तक घेण्याचे सुचवले. या नंतर त्यांनी दामोदर राव यांना दत्तक घेतले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराजा गंगाधरराव यांचे निधन झाले. त्यावेळी लक्ष्मीबाई केवळ 18 वर्षाच्या होत्या. त्या एकट्याच राहिल्या पण त्यांनी आपले धैर्य सोडले नाही आणि आपले कर्तव्य समजले आणि चोखरित्या बजावले.
 
5 ब्रिटिशांचा आक्षेप - ज्या वेळी दामोदर यांना दत्तक घेतले त्यावेळी ब्रिटिशांचे शासन होते. ब्रिटिश सरकारने दामोदर यांना झाशीच्या वारस मानण्यास नकार दिला आणि ते झाशीला आपल्या शासनात मिळविण्याचे कटकारस्तान रचू लागले. त्यावेळी डलहौसी नावाचा व्हाईसराय ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी होता. राणीला हे कळल्यावर त्यांनी वकिलाच्या मदतीने लंडनच्या कोर्टात दावा दाखल केला, परंतु ब्रिटिशांनी त्यांची याचिका नाकारली.
 
6 राजवाडा सोडण्याचे आदेश - मार्च 1854 मध्ये ब्रिटिश सरकारने राणीला महाल सोडण्याचा आदेश दिला पण राणीने ठरवले की मी झाशी कधीही सोडणार नाही. या साठी त्यांनी स्वतःसह झाशीला देखील मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली. पण ब्रिटिश सरकारने त्यांचे सर्व प्रयत्न नाकाम करण्याचे प्रयत्न केले.
 
7 शेजारच्या राज्यांचा हल्ला- झाशीच्या शेजारचे राज्य ओरछा, दतियाने झाशीवर हल्ला केला, पण राणीने त्यांचा हेतू नाकाम केले.
 
8 इंग्रेजांचा हल्ला- 1858 मध्ये ब्रिटिश सरकारने झाशीवर हल्ला करून त्यावर ताबा घेतला, तरीही राणीने धीर सोडले नाही. त्यांनी पुरुषांचा पोशाख घातला आणि आपल्या मुलाला दामोदराला आपल्या पाठीशी बांधले. दोन्ही हातात तलवार घेऊन घोड्याच्या लगाम तोंडात धरून त्यावर स्वार होऊन युद्ध करत शेवटी आपल्या दत्तक पुत्र आणि काही साथीदारांसह तिथून निघाल्या.
 
9 तात्या टोपेंशी भेट - झाशी सोडल्यावर राणी तात्या टोपेंशी जाऊन भेटल्या. ब्रिटिश आणि काही चापलूस भारतीय राज्य देखील राणीचा शोध घेण्यासाठी पाठलाग करत होते.  
 
10 देशाचे गद्दार - तात्यांना भेटल्यावर राणीलक्ष्मीबाई ग्वाल्हेर साठी निघाल्या. देशाच्या गद्दारांमुळे राणीला वाटेत शत्रूंचा सामना करावा लागला. मोठ्या शौर्याने आणि धीराने राणीने लढाई केली आणि युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी (18 जून 1858) रोजी 22 वर्षाची ही महानायिका लढत-लढत मरण पावली. 
 
राणी लक्ष्मीबाई यांचा कारकीर्दीला मानाचा मुजरा.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

फोनचा आवाज कमी झालाय? स्पीकरमध्ये साचलेली धूळ अशी करा साफ, चुकूनही या चुका करू नका

LIVE: मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली

एलपीजी सिलेंडर बुकिंग नियमात बदल; घरगुती गॅस सिलेंडर २५ दिवसांनंतर बुक केले जातील

पार्ट्यांची आवड असलेली सून सासऱ्याच्या बंधनांना कंटाळली, ६ लाखांची सुपारी अन् २६ वार

गोंदियाजवळ बोलेरो आणि ट्रकच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments