Dharma Sangrah

संत तुलसीदास पुण्यतिथी

बुधवार, 30 जुलै 2025 (09:52 IST)
भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. भारतवर्षात अनेक महान संत होऊन गेलेत. त्यापैकीच एक महान संत आहे संत तुलसीदास. आज संत संत तुलसीदास यांची पुण्यतिथी आहे. संत तुलसीदास हे मध्यकालीन हिंदी साहित्याचे महान कवी होते. तसेच ते परम रामभक्त होते. 
 
संत तुलसीदास यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील यमुना नदीच्या काठावर चित्रकूटच्या राजापूर नावाच्या गावात झाला होता. तसेच नंतर किशोर वयात आल्यानंतर त्यांचा विवाह रत्नावली सोबत झाला  होता. जेव्हा पत्नी माहेरी गेली त्यांना राहवले नाही. तुलसीदासांचे पत्नीवर नितांत प्रेम होते. तुलसीदास पत्नीला भेटण्यासाठी रात्री नदीमधून पोहत गेले. व रत्नावली ने तुलसीदासांना खूप रागावले. यानंतर तुलसीदासांनी संसाराचा त्याग केला. व पवित्र शहर प्रयाग करीत निघून गेले. व गृहस्थाश्रमाचा त्याग करून त्यांनी साधुत्व पत्करले. तसेच भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन झाले. यानंतर त्यांनी श्रीरामचरितमानसची रचना आरंभ केली. संत तुलसीदासांना श्रीरामचरितमानसचे रचियता देखील म्हणतात. 
 
तसेच तुलसीदासांनी अखंड प्रभू श्रीरामाची भक्ती केली. विलक्षण तेज त्यांच्यामध्ये निर्माण झाले होते. एकदा संत तुलसीदास हनुमानाचे ध्यान करीत होते. तेव्हा हनुमानजींनी साक्षात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले व प्रार्थनाचे पद रचण्यास सांगितले, यानंतर त्यांनी आपली शेवटची कृति विनय-पत्रिका लिहली आणि तिला भगवंताच्या चरणात अर्पित केले. प्रभू श्रीरामांनी स्वतः त्यांना आशीर्वाद दिले.
 
यानंतर संवत्‌ 1680 मध्ये संत तुलसीदासांनी "राम-राम" म्हणत आपले शरीर त्यागले. संत तुलसीदास हे भारतवर्षातील महान संत होते. ज्यांनी श्रीरामचरितमानस लिहले. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित होणार,मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले-आरोग्यसेवा क्षेत्रातील परिवर्तनात्मक प्रवासाची सुरुवात

शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? काँग्रेस हायकमांडने विलीन करण्याचा मोठा प्रस्ताव दिला

LIVE: शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आज पुणे विद्यापीठाच्या परिसरात भव्य आंदोलन जमले

ठाण्यात रस्त्यावर थुंकण्यापासून रोखल्याबद्दल वृद्ध व्यक्तीला मारहाण केली; मुख्यमंत्रींच्या हस्तक्षेपनंतर कॅब चालकाला अटक

पुढील लेख
Show comments