Dharma Sangrah

मनपा निवडणुकीच्या युतीची चर्चा होणार असेल तर खुलेआम होईल-राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची भेट

शनिवार, 24 डिसेंबर 2022 (08:43 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदनियुक्ती सोहळ्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले होते. सकाळी राज ठाकरे हे विमानतळावर पोहचले तेव्हा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मनसेचा पक्षीय कार्यक्रम आटोपून राज ठाकरे नागपूरच्या विधान भवनात पोहचले आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. 
 
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या या अचानक झालेल्या भेटीवर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे काही पहिल्यांदा भेटलेले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना राज ठाकरे हे भेटले असतील तर त्यात काहीही वावगं नाही, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तसेच राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांचा मोठा पक्ष आहे. किमयागार नेता म्हणून त्यांची देशात असल्याचं कौतुकही प्रताप सरनाईकांनी राज ठाकरेंचं केलं आहे. 
 
दोन मोठे नेते भेटतात, तेव्हा चहापानाचा कार्यक्रम होतो. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून राज्याचे दोन नेते एकत्र आले. मनपा निवडणुकीच्या युतीची चर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल, असं मला वाटतं नाही. तशी चर्चा होणार असेल तर खुलेआम होईल. हजारो लोकं अधिवेशनात येतात. कॅमेरे लागलेले आहेत. त्यामुळं ते खुलेआम भेटल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: २७ जून रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा जारी

बारमाही नफा देणारा व्यवसाय, बाजारात दररोज प्रचंड मागणी; टोमॅटोची यशस्वी लागवड

अपघाताशिवाय कारमधील एअरबॅग अचानक उघडल्याने तरुणाचा गुदमरून मृत्यू

महाराष्ट्रात १५ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा धोका, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला

बारामती पाणीपुरवठा प्रकल्पांना गती, सुनेत्रा पवार यांचे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

पुढील लेख
Show comments