Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यशेंद्र क्षीरसागर यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या दीर्घकवितेचे प्रकाशन

Updated: शुक्रवार, 12 मे 2017 (11:15 IST)
 
सध्याचा भारतातील दीर्घकवितेचा विक्रम हा २६६२ ओळी आणि १०६७० शब्दांचा असून सदर दीर्घकविता आसामी भाषेतील आहे. कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांनी तब्बल ३०६९ ओळींची आणि १३,३६३ शब्दांची ही दीर्घकविता ‘भारतीय संस्कृती’ या विषयाच्या भोवती मोठ्या सामर्थ्याने व ताकदीनिशी गुंफली आहे. मराठी भाषेतील भारतीय संस्कृती या विषयावरील ही सर्वात मोठी कविता ठरत असून या दीर्घकवितेच्या रूपाने सर्वात मोठ्या दीर्घकवितेचा सद्य विक्रम मोडून तो मराठी भाषेच्या नावे नोंद होत आहे. ही दीर्घकविता लिमका बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस अशा भारतातील विविध विक्रमांची नोंद ठेवणा-या नामांकित संस्थांकडे विक्रमांसाठी आपली सशक्त दावेदारी लवकरच पेश करणार आहे. 
 
या उपक्रमात कवितासागर प्रकाशनाचे डॉ. सुनील दादा पाटील यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. सदर दीर्घकवितेस डॉ. कुमार रामगोंडा पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. सदर प्रकाशन समारंभास प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य, कवी विश्वास पारिसा बालीघाटे, प्राचार्य बी. बी. गुरव, कवी विष्णू रामू वासुदेव, उद्योगपती संजय आप्पासो सुतार, राज धुदाट, कवी विजयकुमार आण्णासो बेळंके, विलासराव शंकरराव डोईजड, हरी निवृत्ती जगताप, माणिक नागावे, लेखिका विजया प्रकाश पाटील, कवी डी. बी. चिपरगे, सौ. रोझमेरी राज धुदाट इत्यादी उपस्थित राहणार आहेत.  

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नैतिक कथा : म्हातारे गाढव आणि शेतकऱ्याची गोष्ट

पावसाळ्यात कोणत्या जीन्स वापराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा

पावसाळ्यात गोड आणि रसरशीत नासपती फळ खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

पावसाळ्यात फरशी पुसतांना पाण्यात हे नैसर्गिक घटक मिसळा; कीटक निघून जातील

पुढील लेख
Show comments