Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री सर्वोत्तम दिवाळी अंक... साहित्याची मेजवानी

Updated: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (16:01 IST)
 
या दिवाळी विशेषांकात एकूण २३ ललित लेख, २२ कथा, ०६ प्रवास वर्णन, ०९ व्यक्ति चित्र, ०४ व्यक्ति विशेष भावांजली, ०२ संमेलन वृत्तांत, ६२ कविता, पुस्तकाचे रसग्रहण, वार्षिक राशी भविष्य, आणि रेखाटने असे एकूण १४० पेक्षा जास्त रचनाकारांना स्थान मिळालेले आहेत. या अप्रतिम अशा दिवाळी अंकात ८५ टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रातील साहित्यिक आहे.
 
महाराष्ट्रात, बृहन्महाराष्ट्रातील साहित्यकांची सदैव उपेक्षा केली जात असेल पण या अंकात महाराष्ट्रातील साहित्यिकांना मिळालेले स्थान बघता अंकाचे कौतुक करावेसे वाटते आणि  हे पटते  देखील की भाषेला भूगोल नसतो.
 
ललित लेखांमध्ये, दिल्लीच्या प्रशांत पोळ यांचा ' सूड पानिपतचा ' हा लेख पानिपत युद्धानंतर झालेल्या घडामोडी बद्धल माहिती देतो तर इंदूरच्या संत साहित्याचे अभ्यासक, डॉ. मोहन बांडे यांचा ' ग्रंथरूप संत ' हा लेख संत साहित्याची ओळख करवितो. मुंबईच्या अनुराधा नेरुरकर यांचा लेख ' पर्यटन आणि संस्कृती ' वाढत असलेल्या पर्यटनाच्या ओढी मुळे देशात बदलत असलेल्या पर्यटन संस्कृतीची ओळख करवितो.
 
भोपाळच्या अनिल निगुडकर यांचा लेख ' मराठी साहित्यातील प्रादेशिक कादंबऱ्या ' हा अभ्यासकांना नक्कीच महत्वाचा वाटेल. इतर १९ लेखांमध्ये, कविता, सनातन धर्म, अन्नाचे महत्व, कोरोना महामारी, मित्रत्व,सोशल मीडिया आणि हास्य सारखे सार्थक लेख आपण वाचू शकतो.
 
प्रवास वर्णन या खंडात आपण ' तीर्थक्षेत्र माळगुंदे ', पृथ्वीवरील स्वर्ग समजले जाणारे ' हरिश्चंद्रगड ' , वीर जवानांचे गाव ' टाकळी ' मध्यप्रदेशची राजधानी ' भोपाळ ' आणि कर्नाटकचे ऐतिहासिक क्षेत्र ' हम्पी
' ची भटकंती करू शकतो. इंदूरच्या डॉ.अस्मिता हवालदार या ' हम्पी ' वर व्याख्यान देखील देतात आणि आपल्या व्याख्यानाने हम्पीच्या वेळेस च्या पुरातन काळाला जिवंत देखील करतात. म्हणून त्यांचा हा लेख वाचण्या सारखा आहे.
 
नाना महाराज तराणेकर संस्थान, इंदूरचे डॉ. बाबासाहेब तराणेकर यांचा ' बिन सद्गुरू नर रहत भुलाना ' हा पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत लिहिलेला अप्रतिम असा लेख आहे. महान गायक पंडित कुमार गंधर्व यांचा त्यांच्या कुटुंबाशी असलेला संबंध आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या अनेक भेटींचा उल्लेख करत लिहिलेला भावनिक लेखा मुळे आपल्याला महान व्यक्तिमत्वाचे महत्व  नव्याने  कळते.लेख वाचताना आपण प्रभावीत तर  होतोच पण भावनिक देखील होतो.
कथा खंडात आणि कविता खंडात देखील अनेक विषय कवी आणि कथाकारांनी हाताळले आहेत. याच प्रमाणे लिवा साहित्य सेवा समिती, इंदूर आणि श्री सर्वोत्तम द्वारे संयुक्त रूपाने इंदूर मध्ये आयोजित आणि गेल्या ०५-०६ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न अद्भुत असे ' भारतातील प्रथम नर्मदा परिक्रमा वासी अखिल भारतीय संमेलन ' चे वृत्तांत आपल्याला भारतातच नव्हे तर जगात नद्यांचे महत्व पटवून देते. श्री सर्वोत्तमच्या दिवाळी विशेषांकात या शिवाय देखील इतर बरेच आकर्षण आहेत. पण वाचकांची उत्सुकता कमी करण्याचा माझा मानस नाही. म्हणून एकच आवर्जून सांगतो प्रत्येकाने अवश्य वाचावा असा हा श्री सर्वोत्तम चा दिवाळी विशेषांक आहेत.
 
एकूण पृष्ठ - २८४  विशेषांक मूल्य ३५०/-
gpay साठी  ९४२५०५६४३२
 
विश्वनाथ शिरढोणकर, इंदूर. म.प्र.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

कर्करोगापासून बचावासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा; ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

जोडीदाराचा मूड खराब आहे? वाद घालण्याऐवजी या ४ गोष्टी करून व्यक्त करा तुमचे प्रेम

जातक कथा : राजाने घेतला कौटुंबिक जीवनातून संन्यास

न्यायाधीश होण्याचे स्वप्न पाहताय? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जुनी अट बदलली, नवी अट काय?

मखाना स्नॅक्स: चवदार, कुरकुरीत आणि आरोग्यासाठी वरदान!

पुढील लेख
Show comments