Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Budget 2019 LIVE Updates: पियूष गोयल यांच्याकडून अर्थसंकल्प अर्थसंकल्प संसदेत सादर

Updated: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (12:45 IST)
- ईपीएफओकडून कामगारांना सात हजारांपर्यंत बोनस देण्याचा निर्णय... 
- असंघटीत कामगारांना कमीत कमी ३ हजार रुपये पेन्शन... वयाच्या ६० व्या वर्षानंतर मिळणार फायदा
- नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत २.५० लाखांवरून ६ लाखांवर केली
- ग्रॅज्युईटी १० लाखांवरून २० लाखांवर नेली
- सातवं वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर सरकारनं लगेचच या शिफारशी लागू केल्या
- पाच वर्षांत औद्योगिक शांतता निर्माण केली
- कामगारांचं कल्याण हाच सरकारचा हेतू
- कामगारांकडेही सरकारचं विशेष लक्ष
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा :  शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपयांची रक्कम थेट जमा होणार
- २ हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
- तीन हफ्त्यांमध्ये जमा होणार रक्कम
- १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार... १ डिसेंबर २०१८ पासून योजना लागू
- शेतकऱ्यांसाठी ७५ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
घोटाळेबाजांना आमच्या सरकारमुळे चाप बसला, त्या घोटाळेबाजांची आम्ही संपत्ती जप्त केली आहे- पीयूष गोयल
आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत- पीयूष गोयल
महागाई कमी झाली नसती तर प्रत्येक कुटुंबाला आजच्या पेक्षा ३५ ते ४० टक्के जास्त खर्च करावा लागला असताः पीयूष गोयल
भारताची अर्थव्यवस्था वेगानं विकास करत आहे- पीयूष गोयल
गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ- पीयूष गोयल
यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला- पीयूष गोयल
- देशातील विदेशी गुंतवणुकीत वाढ
- बँकांच्या फेर महसुलीची व्यवस्था पूर्ण केली
- बँकिंग व्यवस्थेमध्ये कमालीच्या सुधारणा
- तीन बँकांवरील निर्बंध हटवले... अन्य बँकांवरील निर्बंधही लवकरच हटवले जातील
- बांधकाम क्षेत्रात 'रेरा'सह अन्य कायद्यांमुळे पारदर्शकता आली
- अगोदर छोट्या व्यावसायिकांवर ऋण फेडण्याचा दबाव होता आता मोठ्या व्यावसायिकांनाही ऋण फेडावं लागतंय  
शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि छोटे व्यापारी यांना आकृष्ट करण्यासाठी सरकारकडून नव्या तरतुदी  
- महसुली तूट ६ टक्क्यांवरून ३.४ टक्क्यांपर्यंत खाली आणली
- जीएसटीमुळे देशाच्या कररचनेत सुधारणा
- दहशतवाद, भ्रष्टाचाराला आळा घातला 
- २०२० पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार
- गेल्या पाच वर्षांत देशाला प्रगती पथावर आणलं
- मूलभूत सोई-सुविधांवर सरकारचा सर्वाधिक भर
- भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था
- महागाईचा दर कमी झाला
- आमच्या सरकारनं महागाईचं कंबरडं मोडलं
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
- पीयूष गोयल यांनी अरुण जेटलींच्या स्वास्थ्य सुधारणेसाठी दिल्या शुभेच्छा
- पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पाच्या वाचनाला केली सुरुवात
- केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी
शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि छोटे व्यापारी यांना आकृष्ट करण्यासाठी सरकारकडून नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत...
यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा बोजा वाढला - गोयल
भारत वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था - गोयल
जीएसटी लागू करणं सरकारसाठी मोठं पाऊल - गोयल 
महागाई कमी झाली नसती तर प्रत्येक कुटुंबाला आजच्यापेक्षा ३५ ते ४० टक्के जास्त खर्च करावा लागला असता -  पीयूष गोयल 
गेल्या पाच वर्षांत देशाला प्रगतीपथावर आणलं - गोयल
सरकारने महागाईचं कंबरडं मोडलं - गोयल 
अरुण जेटली यांच्या प्रकृतीसाठी गोयल यांनी दिल्या शुभेच्छा

- औषधं आणि उपकरणांच्या किंमती कमी केल्या

- गरीब आणि श्रीमंतांमधली दरी कमी करण्यासाठी काम केलं

- गरीब, मध्यमवर्गियांना स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार करोड 

- गावांमध्येही शहरासारख्याच योजना उपलब्ध करून देणार

- स्वच्छ भारतासाठी लक्षणीय काम

- देशातील विदेशी गुंतवणुकीत वाढ

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Independence Day 2026 Wishes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रिलायन्स-रोल्स रॉइस भागीदारी करून भारतात एएमसीए लढाऊ विमानासाठी स्वदेशी इंजिनांची रचना आणि निर्मिती करणार

नागपूरमध्ये गर्भपाताच्या अवैध औषधांचे रॅकेट उघडकीस, दोघांना अटक

LIVE: कंपन्या बंद पडल्याच्या वृत्तांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले

एफडीएने पार्ले ॲग्रोच्या चेंबूर येथील गोदामावर ११ तासांचा छापा टाकला, मुदत संपलेली फ्रुटी व शीतपेये जप्त

पुढील लेख
Show comments