Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आषाढी वारीची नियोजन बैठक रद्द

Updated: गुरूवार, 2 एप्रिल 2020 (14:09 IST)
आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीचे नियोजन करण्यासंदर्भात चैत्र शुध्द दशमी म्हणजे शुक्रवार, 3 रोजी पंढरीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मठात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु सध्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून गावोगावच्या जत्रा, यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मंदिरेही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाउन लागू केले आहे. अशा परिस्थितीत देशावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे आहे.

यासाठी वारकरी संप्रदायाने हा निर्ण जाहीर केला आहे. दरम्यान, चैत्री वारीला राज्यभरातून सुमारे 3 ते 4 लाख वारकरी पंढरपूरला येतात. हे सर्वजण एकत्र आल्याने कोरोना हा संसर्गजन्य रोग सर्वत्र पसरण्याची भीती आहे. त्यामुळे हीमहामारी आटोक्यात येण्याऐवजी त्याचा प्रसार होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे यंदाच्या चैत्री वारीलाही वारकरी, फडकरी समाजाने येऊ नये असे आवाहनही कोकाटे हाराज यांनी केले आहे.

तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची चैत्री यात्रा रद्द केल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपुरात लाऊडस्पीकर आणि डीजेच्या आवाजावर निर्बंध, प्रदूषणमुक्त नागपूर पोर्टल लवकरच सुरू होणार

LIVE: महाराष्ट्र सरकारने किनारपट्टी भागातील मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली

एअर इंडियाच्या विमानाला हवेत हादरे, अनेक जखमी

पंतप्रधान मोदींची जादू संपली, बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

पुढील लेख
Show comments