suvichar

आषाढी वारीची नियोजन बैठक रद्द

गुरूवार, 2 एप्रिल 2020 (14:07 IST)
आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी चैत्र शुध्द दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणारी वारकरी फडकरी दिंडी समाजाची बैठक रद्द करण्यात आली असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कोकाटे यांनी दिली.

आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीचे नियोजन करण्यासंदर्भात चैत्र शुध्द दशमी म्हणजे शुक्रवार, 3 रोजी पंढरीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मठात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु सध्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून गावोगावच्या जत्रा, यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मंदिरेही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाउन लागू केले आहे. अशा परिस्थितीत देशावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे आहे.

यासाठी वारकरी संप्रदायाने हा निर्ण जाहीर केला आहे. दरम्यान, चैत्री वारीला राज्यभरातून सुमारे 3 ते 4 लाख वारकरी पंढरपूरला येतात. हे सर्वजण एकत्र आल्याने कोरोना हा संसर्गजन्य रोग सर्वत्र पसरण्याची भीती आहे. त्यामुळे हीमहामारी आटोक्यात येण्याऐवजी त्याचा प्रसार होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे यंदाच्या चैत्री वारीलाही वारकरी, फडकरी समाजाने येऊ नये असे आवाहनही कोकाटे हाराज यांनी केले आहे.

तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची चैत्री यात्रा रद्द केल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीला चिथावणी देणे महागात पडले; सामनाधिकाऱ्याने दोन श्रीलंकन ​​खेळाडूंना शिक्षा आणि दंड ठोठावला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

Maharashtra Legislative Council Elections नाशिक-सोलापूरमध्ये ४ दिवसांचा 'ड्राय डे' जाहीर, दारू विक्रीवर संपूर्ण बंदी

पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांवर; उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

मुलीच्या जन्माचा आनंद शोकात बदलला; नाशिक अपघातात सुट्टीवर असलेल्या जवानाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments