Festival Posters

'तर' त्याच्यावर कारवाई होणार : अनिल देशमुख

शुक्रवार, 20 मार्च 2020 (07:54 IST)
कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, कोरोनाचे जे संशयित आहेत, त्यांना कोरोना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. मात्र, विलगीकरण केंद्रातून काही जण पळून जात आहेत. याबाबत राज्य शासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. आता यापुढे कोणीही पळून गेला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांनी दिले आहेत. 
 
संशयित कोरोना रुग्णांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे.मात्र, विलगीकरण केंद्रातून रुग्ण पळून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा रुग्णांवर आता साथीचे रोग अधिनियमान्वये कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या आदेशाचे पालन करती असे कोणी पळून गेले तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य पोलिसांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, केंद्रातून पळून जाणाऱ्यांवर "साथीचे रोग अधिनियमान्वये" कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पोलिसांना दिले आहेत. देशमुख यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यात कोरोना विषाणूंचा होणारा फैलाव रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. 
 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

मराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे अनिवार्य; १५ ऑगस्टनंतर कारवाई होणार

देशांतर्गत स्पर्धेतून माघार घेतल्याने मनिका बत्रा अडचणीत, आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही बाहेर

७ धावांनी पिछाडीवर असूनही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला चांगलेच झुंजवले

LIVE: राज्य सरकारने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अनिवार्य केले

वडिलांसाठी फादर्स डे निमित्त घरच्या घरी हॉटेलसारखा भव्य बेत; येथे पहा रेसिपीज

पुढील लेख
Show comments