Marathi Biodata Maker

Essay on Cricket In Marathi : क्रिकेट आणि त्याचा इतिहास जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (22:39 IST)
खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्व प्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता. आणि तेव्हा पासून तर आज पर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीच्या काळात क्रिकेट फक्त राजा महराजांद्वारे खेळला जायचा. परंतु स्वातंत्र्यानंतर या खेळाला सर्वजण खेळायला लागले. या मैदानी खेळामध्ये प्रत्येकी 11 खेळाडूंचे दोन संघ असतात. 50 षटके पूर्ण होईपर्यंत क्रिकेट खेळले जाते. 
 
क्रिकेटचा इतिहास
ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारादरम्यान, हा खेळ परदेशात खेळला गेला आणि 19 व्या शतकात, ICC द्वारे 10-10 सदस्यांच्या दोन संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला गेला. क्रिकेट हा एक अतिशय प्रसिद्ध खेळ आहे जो इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण-आफ्रिका इत्यादी जगातील अनेक देशांमध्ये खेळला जातो.
भारतातील लहान मुलांना या खेळाचे वेड आहे आणि ते लहान मोकळ्या ठिकाणी, विशेषतः रस्त्यावर आणि उद्यानात खेळतात. 
 
कसे खेळायचे -
क्रिकेटच्या खेळामध्ये 11खेळाडू असलेले दोन संघ असतात, त्यासोबतच या खेळात न्यायाधीश म्हणून दोन पंच असतात, जे सामन्यादरम्यान झालेल्या चुकांवर लक्ष ठेवतात आणि त्यानुसार आपला निर्णय देतात. सामना सुरू होण्यापूर्वी, कोण प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करेल हे ठरवण्यासाठी एक नाणे फेकले जाते.
दोन्ही संघ आळीपाळीने फलंदाजी करतात, जरी नाणेफेक (नाणेच्या नाणेफेकीवर अवलंबून) प्रथम कोण फलंदाजी करेल किंवा गोलंदाजी करेल हे ठरवते. 
संपूर्ण जगात क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये आपला देश सर्वाधिक प्रसिद्ध आहे.
 
क्रिकेट हा एक उत्साहाने खेळला जाणारा खेळ आहे ज्यामध्ये गरजेनुसार नवनवीन बदल होत आहेत आणि आज या बदलांमुळे कसोटी सामन्यांच्या जागी एकदिवसीय क्रिकेट सामने अधिक लोकप्रिय झाले आहेत. क्रिकेटचे सामने दोन तऱ्हेचे असतात. एक दिवसीय सामना व पाच दिवसीय सामना. एक दिवसीय सामन्यात दोन्ही टीम ठरलेल्या ओव्हर खेळतात आणि मॅच चा निर्णय पण त्याच दिवशी कळून जातो. पाच दिवसीय मॅच लांब चालते. यात ओव्हर ची संख्या अनिश्चित असते आणि खेळाडू दररोज संध्याकाळ होई पर्यन्त असे पाच दिवसापर्यंत खेळतात. क्रिकेट चे सामने दोन संघामध्ये होतात. क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू आणि बॅट आवश्यक असतात. क्रिकेटची मॅच दोन्ही टीम मध्ये टॉस ने सुरू होते. मॅच च्या ओव्हर ठरलेल्या असतात. प्रत्येक ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. बॉल टाकण्याचे पण नियम असतात. जर बॉल व्हाईट किंवा बाउन्सर गेला तर त्या बॉल ला नो बॉल घोषित करून, बॅटिंग करणाऱ्या टीम ला अतिरिक्त रन दिले जातात. बॅटिंग करणाऱ्या संघाचे दोन खेळाडू पिच वर थांबतात. व बॉलिंग टाकणाऱ्या संघाचे खेळाडू संपूर्ण मैदानात चारही बाजूनां उभे राहतात. नंतर बॉलिंग करणाऱ्या संघातून एक खेळाडू  बॉल समोर बॅट्समन च्या दिशेला फेकतो. बॅटिंग करणारा खेळाडू बॅट ने बॉल ला मारून चौकार किंवा षटकार मारतो. अश्या पद्धतीने रन एक एक करून दोघी टीम बॅटिंग आणि बॉलिंग करतात. व शेवटी ज्याचे रन जास्त तो संघ जिंकतो. क्रिकेटमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. खेळाच्या भावनेने खेळ खेळणे, विजय-पराजय बाजूला ठेऊन खेळाच्या कलेचा आनंद घेणे, खेळातील बंधुत्वाची भावना किंवा जीवनातील सर्वोत्तम गुण क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतात. 
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments