Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद मराठी निबंध

Updated: शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025 (08:06 IST)
 
हॉकीमध्ये यशाची शिखरे गाठताना त्यांना सुभेदार, लेफ्टनंट आणि कॅप्टन ही पदे अगदी सहज मिळाली. पुढे ध्यानचंद यांची क्षमता पाहून त्यांची मेजर पदावर नियुक्ती करण्यात आली.
 
ध्यानचंद यांनी 1928 मध्ये अॅमस्टरडॅम, 1932 ला लॉस एंजेलिस आणि 1936 च्या बर्लिन ऑलंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं होतं.
 
मेजर ध्यानचंद यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाचा तो सुवर्णकाळ होता. मेजर ध्यानचंद यांचा खेळ आवडल्यानं जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात मोठं पद देऊ केलं आणि जर्मनीसाठी हॉकी खेळण्यास सांगितलं.
 
ध्यानचंद त्यावेळी भारतीय लष्करात लान्स नायक या कनिष्ठ पदावर कार्यरत होते. पण जर्मन सैन्यातल्या मोठ्या पदाची ऑफर ध्यानचंद यांनी स्पष्टपणे नाकारली.
"मी भारताचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे भारतासाठीच कायमचा खेळत राहीन," असं ध्यानचंद नम्रपणे हिटलरला म्हणाले.
 
मेजर ध्यानचंद जेव्हा हॉकी स्टिक घेऊन मैदानात उतरायचे तेव्हा चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला चिकटायचा. अनेकवेळा ध्यानचंद इतके विलक्षण गोल करायचे की, तिथे बसलेल्या सर्व खेळाडूंना आणि लोकांना त्याने फसवले की काय अशी शंका येत असे.
 
ध्यानचंद यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा ते मैदानात उतरायचे तेव्हा विरोधी संघातील खेळाडूंचे हृदयाचे ठोके वेगाने वाढायचे.मेजर ध्यानचंद यांनी भारतासाठी तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांनी भारताचा तिरंगा जगभर फडकवला होता. 1928 मध्ये अॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा हॉकी खेळात भाग घेतला तेव्हा मेजर ध्यानचंद यांनी तेथे 11 सामने खेळले आणि यश मिळवले.
 
मेजर ध्यानचंद यांनी ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, हॉलंड, लॉस एंजेलिस, बर्लिन आणि जपान अशा अनेक मोठ्या देशांमध्ये भारताचा ध्वज उभारला. भारतीय असल्याने त्यांनी गुलामगिरीच्या काळातही भारतीयांना नवी ओळख आणि दिशा दिली होती.
 
जेव्हा ध्यानचंद यांनी ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला अनेक पुरस्कार दिले होते, तो क्षण सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मेजर ध्यानचंद्र यांनी 3 डिसेंबर 1989 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले.
 
त्यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. 1956 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते . त्यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील नॅशनल स्टेडियमचे 2002 मध्ये ध्यानचंद नॅशनल स्टेडियम असे नामकरण करण्यात आले .
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Independence Day Recipes 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष खास तिरंगा रेसिपीस

सकाळी भिजवलेले अंजीर खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे; योग्य पद्धत जाणून घ्या

Income Tax Recruitment : आयकर विभागात १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ७ पदांची भरती संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

मेकअप काढताना या चुका अजिबात करू नका! त्वचेची काळजी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

पिकलेला फणस खाण्यापूर्वी ‘या’ लोकांनी घ्या विशेष काळजी! योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments