Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

G-20 शिखर परिषदेतून भारत एक शक्ती म्हणून उदयास येईल का?

Updated: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (14:57 IST)
 
शहरात ठिकठिकाणी भव्य कारंजे, फुलांच्या कुंड्या आणि राष्ट्रध्वज लावण्यात आले आहेत. शहरातील डझनभर ऐतिहासिक वास्तू उजळून निघाल्या आहेत. यामध्ये G-20 चा लोगोही ठळकपणे दिसून येतो.
georgia melony
या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. शहरातील प्रमुख उद्यानांना नवं रुप देण्यात आलं आहे. त्यांची पानं नुकतीच छाटली गेली आहेत. त्यात G-20 शिखर परिषदेत सहभागी देशांचे ध्वज लावण्यात आले आहेत.
 
या सुशोभीकरणाचा आणखी एक पैलू आहे. शहरातील अनेक झोपडपट्ट्या परदेशी पाहुण्यांच्या नजरेत पडू नयेत यासाठी कपड्यानं झाकल्या गेल्या आहेत. तर काही ठिकाणी राहणाऱ्या लोकांना हलवण्यात आलं आहे. शहरातील प्रमुख ठिकाणांहून भिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. त्यांना कुठं नेण्यात आलं आहे, याची माहिती मिळालेली नाही.
 
सरकारनं दिल्लीत तीन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. या काळात बहुतांश शाळा आणि कार्यालये बंद राहतील.
 
काही रस्त्यांवरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. परिषदेपूर्वी हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय शेकडो उड्डाणं आणि गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 
भारतानं एकाच वेळी इतक्या आंतरराष्ट्रीय नेत्यांचं यजमानपद कधीच घेतलेलं नाही.
 
युक्रेनचा मुद्दा दिल्लीतही गाजणार का?
 
भारताचे माजी राजदूत जितेंद्र नाथ मिश्रा म्हणतात, " भारत हा परराष्ट्र व्यवहार आणि देशांतर्गत राजकारण यांच्यातील रेषा पुसट करण्याचा प्रयत्न करत आहे. हे साध्य करण्यासाठी G-20 हा सर्वात महत्त्वाचा मंच आहे. याची जाणीव सरकारला आहे."
 
कार्निवलसारख्या वातावरणातही युक्रेन युद्ध यासारख्या मुद्द्यांची झळ बसणार नाही , याची काळजी घेण्याचं नाजूक काम भारताकडे असेल.
 
गेल्या वर्षी बाली, इंडोनेशिया इथं झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान मतभेद दिसून आले होते.
 
जितेंद्र नाथ मिश्रा म्हणतात, "युक्रेनसारख्या फूट पाडणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी सहमतीच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशी भारताची अपेक्षा आहे." आतापर्यंत असं करण्यास तो सक्षम नव्हता, पण आता ते अधिक चांगल्या प्रकारे करू इच्छितात. "
 
जागतिक महासत्तांमध्ये भारत
G-20 चं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, भारतानं सांगितलं की, विकसनशील देशांवर परिणाम करणारे मुद्दे ते या परिषदेच्या अजेंड्यावर असतील, जसं की हवामान बदल, विकसनशील देशांवर कर्जाचा वाढता बोजा, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन, वाढती महागाई आणि अन्न- ऊर्जा सुरक्षा.
 
हॅप्पीमान जेकब हे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय धोरण शिकवतात. ते म्हणतात की, ही शिखर परिषद अशा वेळी होत आहे जेव्हा 'ग्लोबल साउथ'नं आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत एक प्रमुख भागधारक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात भारतानं यश मिळवलं आहे.
 
त्याचं वेळी, पाश्चिमात्य देशांना हे लक्षात आलं आहे की, केवळ त्यांचा एकमेव क्लब संपूर्ण जगाच्या समस्या सोडवू शकत नाही.
 
वाढती असमानता, अन्न आणि खनिज तेलाच्या वाढत्या किंमती आणि वातावरणातील बदल यांमध्ये अनेक देश आता G20 सारख्या पाश्चिमात्य-वर्चस्व मंचाच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ते सत्तेच्या जुन्या जागतिक वितरणावर आधारित असल्याचा दावा करतात.
 
प्रोफेसर जेकब म्हणतात की, हे कोरोना साथीच्या काळात स्पष्टपणे दिसत होतं की, जेव्हा भारतानं आफ्रिका, दक्षिण आशिया आणि चीनला मदतीचा हात पुढे केला होता, तर पाश्चात्य देश फक्त त्यांच्याच चिंतेत व्यस्त होते.
 
प्रोफेसर जेकब म्हणतात, "देशांतर्गत लोकसंख्या आणि ग्लोबल साउथला संदेश हा आहे की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. भारत नेतृत्व करण्यास तयार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेश हा आहे की, जगाच्या या भागातून येणाऱ्या चिंतेकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही."
 
हे उदाहरण देत जितेंद्र नाथ मिश्रा म्हणतात की G-20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याचा प्रस्ताव विकसनशील देशांना पाठिंबा देण्याची भारताची इच्छा दर्शवितो.
 
जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या भारताकडे हे साध्य करण्याची क्षमता आणि साधनं दोन्ही आहेत असं वाटतं.
 
परंतु भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील स्थितीत असलेल्या भारतासाठी विकसित आणि विकसनशील देशांमधील पूल बांधण्याचा प्रयत्न करणं सोपे जाणार नाही.
 
G-20 शिखर परिषद आणि भारताचं देशांतर्गत राजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं G-20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. विशेषत: पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ते जगामध्ये भारताचं स्थान मजबूत करण्यास सक्षम असल्याचं दाखवू इच्छितात.
 
भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात परराष्ट्र धोरण पारंपारिकपणे महत्त्वाची भूमिका बजावत नाही, जोपर्यंत ते शेजारी पाकिस्तान किंवा चीन आणि अमेरिकेच्या बाबतीत होत नाही.
 
पण पंतप्रधान मोदींच्या सरकारच्या काळात हे बदल होत आहेत. भारतीय महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांना जगात त्यांच्या प्रतिमेची काळजी आहे आणि मोदीही तेच करत आहेत.
 
प्रोफेसर जेकब म्हणतात, “ त्यांनी जागतिक राजकारणी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एक मोठी आणि यशस्वी G-20 परिषद त्यांची प्रतिमा आणखी उजळ करेल.
 
 मिश्रा म्हणतात की, युक्रेन प्रश्नामुळे या शिखर परिषदेत अडथळे आले असले तरी लोक या शिखर परिषदेकडे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तर वाढवणारी घटना म्हणून पाहतात.
 
पण पंतप्रधान मोदींना अजूनही त्यांच्या देशांतर्गत आघाडीवर बरेचं काही करायचं आहे, जसं की लाखो लोकांसाठी रोजगार निर्माण करणं.
 
मानवी हक्कांशी संबंधित प्रश्न आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मुस्लीम आणि इतरांविरुद्ध 'हेट क्राइम' वाढल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
 
मोदी सरकार हे आरोप फेटाळून लावत आहे. ते म्हणतात की, त्यांची धोरणं सर्व भारतीयांसाठी सर्वसमावेशक आहेत. हाच संदेश पंतप्रधान मोदींना शिखर परिषदेतून देश आणि जगातील लोकांना द्यायचा आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये उत्पादनादरम्यान भीषण स्फोट; अनेक कामगार रुग्णालयात दाखल

मुंबई आयकर कार्यालयाच्या तळघरात भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण

LIVE: गिरीश महाजन यांची नाशिकचे तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

Thorle Bajirao Peshwa पराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती

चंद्रपूरमध्ये दोन गाड्यांची भीषण धडक होऊन महिला पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments