Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐसी सद्‌गुरु माउली

Updated: शुक्रवार, 27 जुलै 2018 (12:52 IST)
 
दुसरे उदाहरणदेखील समर्थांच्या रोखठोक शैलीला साजेसेच आहे. तोफेला बत्ती लावली आणि तिच्या मालकालाच त्या तोफेपुढे उभे केले. तोफेच्या तोंडी दिले. तर ती तोफ काय भीड बाळगेल? नाही. ती तिचे काम चोख बजावेल. त्या मालकालादेखील उडवूनच देईल. अर्थात जो कोणी सद्‌गुरूंना शरण जाईल, त्यांचा अहंकार सद्‌गुरू शिल्लक ठेवणार नाहीत. त्यानंतर समर्थ कापराचा दृष्टांत आपल्यासोर ठेवतात. कापूर पेटवला तर एक सुंदर ज्योत प्रकाशित होते. परंतु कापराचे अस्तित्व मात्र संपून जाते. तसेच गुरुकृपेने स्वतःचे मूळस्वरूप जाणल्यावर साधकाला अन्य गोष्टींमध्ये रस राहत नाही. कापराची जशी ज्योत होते, तसाच शिष्यदेखील आत्मस्वरूप होतो.
 
सद्‌गुरू दयाळू असतात. ते मातृहृदयी असतात. समर्थ म्हणतात, सद्‌गुरू माउलीने कृपारूपी बत्ती लावली आहे. त्याने जन्मजन्मांतरीचा अहंकार नष्ट झाला. 'मी'पणा नष्ट झाला. सद्‌गुरुकृपेने स्वयंभू ज्योतिर्मयस्वरूप अनुभवास आले. सद्‌गुरुंनी स्वरूपाचे दर्शन घडवले. गुरुपौर्णिमेला आपण सद्‌गुरूंचे पूजन करतो. गुरु म्हणजे 'मोठा' जे आपल्याहून मोठे त्यांच्यापुढे नतस्तक व्हावे. त्यांचे पूजन करावे. सद्‌गुरूंच्या चरणी आपला 'मी'पणा अर्पण करावा. तेव्हाच या पौर्णिमेच्या पूर्णचन्द्राचे चांदणे आपल्या जीवनामध्ये पडेल असे सांगणारी ही गुरुपौर्णिमा आहे.
 
सचिन जहागीदार 

सर्व पहा

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

उपवासात चालणारे ७ पौष्टिक पदार्थ, दिवसभर राहाल ऊर्जावान

पवित्र संगमेश्वर मंदिर, जिथे दोन नद्यांच्या संगमावर इतिहास आणि भक्तीचा एक अनोखा प्रवाह दिसतो

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments