Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोण होते संत गाडगे बाबा? Gadge Maharaj

संत गाडगेबाबा यांची संपूर्ण माहिती

Updated: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (10:24 IST)
 
याचे कारण समाजसुधारणेचे जे कार्य ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला उपदेश करून करत होते, तेच काम डॉ. आंबेडकर राजकारणातून करत होते. गाडगे बाबांच्या कार्यामुळेच डॉ. आंबेडकर तथाकथित ऋषी-संतांपासून दूर राहून गाडगे बाबांचा आदर करत असत. गाडगे बाबांना ते वेळोवेळी भेटत असत आणि समाजसुधारणेच्या मुद्द्यांवर त्यांचा सल्ला घेत असत. 
 
संग गाडगे बाबा कार्य
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले. ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
1908 मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
1925 मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे काम केले आणि एक धर्मशाळा व एक विद्यालय बांधले.
1917 मध्ये पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
1921 मध्ये मराठा धर्मशाळा पंढरपूर येथे सदावर्त उघडले.
1932 मध्ये नाशिक येथे सदावर्त उघडले.
1931 मध्ये वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
1949 मध्ये स्वतः पंढरपूर येथे स्थापन केलेल्या 'संत चोखामेळा धर्मशाळे'ची सर्व कागदपत्रे स्वतःचा अंगठा उमटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपूर्द केले.
1952 मध्ये 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
1954 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची अंतर्गत कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना केली.
1954 मध्ये गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
 
14 नोव्हेंबर 1956 रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले. 20 डिसेंबर 1956 रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे त्यांचा मृत्यू झाला. गाडगेनगर अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे.
 
संत गाडगेबाबांनी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले. ते एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून 'जातीय सलोखा' निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. त्यांनी 'शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन' सुरू केले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं होते. वाईट चालीरिती परंपरा रूढी बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकीता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. 
 
संत गाडगे बाबांचे उपदेश साधे आणि सोपे असत. चोरी करू नये, कर्ज काढू नये, व्यसनांच्या आहारी जाऊ नये, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नये, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नये असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत.
 
संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश
भुकेलेल्यांना अन्न
तहानलेल्यांना पाणी
उघड्या नागड्यांना वस्त्र
गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत
बेघरांना आसरा
अंध, पंगू रोगी यांना औषधोपचार
बेकारांना रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय
गरीब तरुण-तरुणींचे लग्न
दुःखी व निराशांना हिंमत
गोरगरिबांना शिक्षण

सर्व पहा

कोण होते महादेवाचे ते ८ महान भक्त? ज्यांना खुद्द भोलेनाथांनी दिले अमरत्वाचे वरदान!

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments