Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३७

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (15:01 IST)
 
मच्छिंद्रनाथानें दत्तात्रेयाचें नांव घेतल्याचें पाहून नागनाथं संशयांत पडला. आपल्या गुरुचें स्मरण करित असल्यामुळें हां कोण व कोणाचा शिष्य ह्याचा शोध करण्याकरितां नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारूं लागला. तेव्हां ' आदेश ' करुन मच्छिंद्रनाथानें आपलें नांव सांगुन म्हटलें, माझा गुरु दत्तात्रेय, त्याच्या मी शिष्य आहे. माझ्याजवळ जालंदर, नंतर भर्तृहरी, त्याच्यामागुन रेवण. या नाथपथांत प्रथमच मीच आहे. म्हणुन मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे. अशी मच्छिंद्रनथानें आपली हकिकत सांगितली. ती ऐकून नागनाथास कळवळा आला. त्यानें लागलेंच गरुडांचे बंधन सोडुन गरुडाचा जप केला तेव्हां गरुड खालीं उतरला व सर्प भयभीत होऊन व विष शोधून अदृश्य झाले. गरुडाचें काम होतांच तो दोघां नाथांस नमस्कार करुन स्वर्गास गेला. नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पायां पडला व म्हणाला, वडील बधु पित्यासमान होय, म्हणुन तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहांत. मग त्यास तो आपल्या मठांत घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतलें.
 
एके दिवशीं मच्छिंद्रनाथानें नागनाथास विचारलें कीं, तूं दाराशीं सेवक ठेवुन लोकांना आंत जाण्यास प्रतिबंध करतोस ह्यातील हेतु काय, तो मला सांग. भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात. तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊं दिलें नाहीं म्हणजे त्यांना परत जावें लागतें. आपला दोघांचा तंटा होण्याचें मुळ कारण हेंच. हें ऐकून नागनाथानें आपला हेतु असा सांगितला कीं, मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्यानें धानभंग होतो. म्हणुन दाराशीं रक्षक ठेविले. त्यावर मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितलें कीं असें करणें आपणास योग्य नाहीं. लोक पावन व्हावयास आपल्या कडे येतात. व ते दारापासुन मागें जातात. तरी आतांपासुन मुक्तद्वार ठेव. असें सांगुन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले.
 
इकडे दाराशीं मनाई नसल्यामुळें नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊं लागली. त्या नाथाच्या शिष्यांतच गुलसंत म्हणुन एक शिष्य होता. त्यांची स्त्री मठांत मृत्यु पावली; तिला नाथानें उठविलें. हा बोभाटा झाला. मग कोणी मेलें म्हणजे प्रेत मठांत नेत व नागनाथ त्यास जिवंत करुण घरीं पाठवुन देई; यामुळें यमधर्म संकटांत पडला. त्यानें हें वर्तमान ब्रह्मदेवास कळविलें, मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्यानें नाथाचा स्तव करून तें अद्‌भुत कर्म करण्याचें बंद करविलें.

सर्व पहा

रक्षाबंधनला तुमच्या बहिणींना या ७ भेटवस्तू देऊ नका, नात्यात दुरावा येऊ शकतो

रक्षाबंधन विशेष पारंपरिक मिठाईला द्या मॉडर्न टच! भावासाठी बनवा या ट्रेंडी स्वीट डिशेस

वाराणसीतील या मंदिरात भगवान शिव खिचडी खाण्यासाठी येतात! शिवलिंगात भगवान विष्णू,लक्ष्मी आणि पार्वती शक्तींचाही समावेश

कपाळावर कुंकू का लावले जाते? लाल रंगाच्या कुंकवाला इतके महत्त्व का?

लग्नानंतर पहिली मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या परंपरेमागचे धार्मिक कारण

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments