Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडिल : एक वटवृक्ष

Updated: शुक्रवार, 14 जून 2019 (14:14 IST)
1972 चा दुष्काळ होता, सूर्य अक्षरशः आग आकत होता, पाण्यासाठी लोक कित्येक किलो मीटर अनवाणी जायचे. गावाचे सरपंचच काय गावाचे पाटील व गावातील प्रतिष्ठीत लोक रोजगार हमीच्या दररोज मारामार असायची... उपाशी तपशी दिवस व रात्र काढणे तर नित्याचेच होत. मी तेव्हां 6/7 वर्षाचा असेल, घरात खाणारी आम्ही सहा भावंडे व आई वडील... शिळ्या तुकड्या वरून ही आम्हा भावंडात ओढा ओढी होत असे... ते शिळे तुकडे ही शिल्लक नव्हते ...आई ने सांगितले, वडिलांना बघ म्हणून... मी अनवाणीच दगड काटे तुडवीत मी दूर माळ रानावर वडिलांना एका दगडावर बसलेले पहिले...आजू बाजूला दूर दूर पर्यंत कुणीच नव्हते ...जवळ जाऊन पाहतो तर आमचे आण्णा जोर जोरात ओक्साबोक्षी रडत होते ....अगदी हंबरडा फोडूनच... मी हि त्यांच्या सुरात सूर मिळवला... पण कळले काहीच नाहीं... तो प्रसंग अजूनही मनात घर करून राहिलेला आहे...
 
...तर सांगायचा मुद्दा हा होता कि पुरूष हृदय हे विशाल वट (वड) वृक्षा सारखे असते...वरून सर्व आलबेल दिसत असते ....सर्वाची काळजी घेत असते... सर्वांची किलबिल ह्यांच्या हृदयाला फुटलेल्या फांद्यावर, पानावर, फुलावर, फळावर सुरू असते ...आणि हे असते तटस्थ, कुठल्याही भावना मनातल्या मनात जिरवून...
 
... अन एक दिवस.... काही कळायच्या आत धाडदिशी उन्मळून पडतात... कोसळतात... नंतर आपल्याला कळते...अरे आपण पोरके जालोय ...आपले आकाशच हरवले आहे ... आपल्या पंखाना जरी बळ आलेले असले, ...तरी, पाय स्थिर पणे ठेवावेत असा आधारच राहिला नाहीं... आमचाही आधार पणे ठेवावेत असा आधारच राहिला नाहीं... आमचाही आधार असाच 8 वर्ष पूर्वी निघून गेला....असो.
 
अमर बाळासाहेब कुसाळकर

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

LIVE: जीशान सिद्दीकीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या

रेल्वे प्रवास पूर्ण झाल्यावरही तिकिटाचा परतावा मिळू शकतो; पण हा लाभ कोणाला मिळतो?

तरुण तेजपाल यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

पुढील लेख
Show comments