suvichar

चालण्याच्या पद्धतीतून होऊ शकेल व्यक्तीची ओळख

रविवार, 3 जून 2018 (13:43 IST)
शास्त्रज्ञांनी एक अनोखी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यंत्रणा विकसित केली असून ती लोकांच्या चालण्याच्या पद्धतीआधारे त्यांची ओळख करू शकते. विमानतळांवरील सुरक्षातपासणीवेळी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान सध्याच्या सुरक्षा तपासणी पद्धतींच्या तुलनेच्या जास्त प्रभावी ठरू शकेल, असा दावा केला जात आहे. 
 
हे नवे तंत्रज्ञान थ्रीडी फूट स्टेप (पाऊल) आणि वेळेवर आधारित डाटाच्या विश्लेषणावर काम करते. स्पेनमधील माद्रिद युनिव्हर्सिटी व ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाआधारे शंभर टक्के अचूक पद्धतीने लोकांची ओळख केली. या संपूर्ण प्रणालीत चूक होण्याचे प्रमाण अवघे 0.7 टक्के असते. सुरक्षा तपासणीसाठी सध्या फिंगर प्रिंट, चेहर्‍याचे छायाचित्र, डोळ्यांचे दृष्टिपटलाच्या स्कॅनसारख्या पद्धतींचा सर्वात जास्त वापर केला जातो. या अध्ययनाचे प्रमुख ओमर कोस्टिला यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीचे चालतेवेळी सुमारे 24 वेगवेगळे फॅक्टर व हालचाली होतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीची चाल वैशिष्ट्यपूर्ण असते. याचआधारे त्याला सहजपणे इतरांपेक्षा वेगळे केले जाऊ शकते. या हालचालींवर नजर ठेवली तर संबंधित व्यक्तीची ओळख केली जाऊ शकते. हाताचेठसे घेण्याच्या पद्धतीच्या तुलनेत हे तंत्रज्ञान जास्त चांगले परिणाम देते. हे तंत्रज्ञान गजबजलेल्या व गोंगाटाच्या स्थळांवरही पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त प्रभावीही आहे.
 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नाशिकात लाडकी बहीण योजनेच्या चौकशीत ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणीत सुमारे दीड लाख महिला अपात्र ठरल्या

LIVE: नाशिकमध्ये लाडकी बहिण योजनेत ई-केवायसी आणि कागदपत्रांमधील त्रुटींमुळे दीड लाख महिला अपात्र

एलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलियनपती बनले

डीआरडीओने जहाजविरोधी आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींची यशस्वी चाचणी करून भारताची ताकद वाढवली

१ ऑगस्टपासून महाराष्ट्रात एसटी बस प्रवासाचे नियम बदलणार, प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य होणार

पुढील लेख
Show comments