Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमच्या तुकड्यांवर वाढणारे आमच्याशी लढायला येताय...अबू आझमींचा नवाब मलिकांवर निशाणा

Updated: सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (16:51 IST)
 
महाराष्ट्र निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. अशीच एक जागा आहे शिवाजीनगर. या जागेवर नवाब मलिक आणि अबू आझमी यांच्यात स्पर्धा आहे. हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहे. सध्या दोघात शाब्दिक युद्ध सुरु आहे. 

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. राजकीय पक्षांचे नेते एक मेकांवर शाब्दिक हल्ले करत आहे. दरम्यान सपाचे उमेदवार अबू आझमी यांनी नवाब मालिकांवर निशाणा साधत म्हणाले. हे आमच्या तुकड्यांवर वाढले आता ते आमच्याशी लढायला आले आहे. अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते. त्यांच्या विरोधात नवाब मलिक हे लढत आहे. 
 
अबू आझमी रविवारी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नवाब मलिकसाठी ते म्हणाले की, जे माझ्या तुकड्यांवर मोठे झाले तेच आता माझ्याविरुद्ध लढत आहेत. ज्याने आपल्या जावयाला  ड्रग्जच्या प्रकरणात नेहमीच संरक्षण दिले तेच आता अंमली पदार्थांचे व्यसन संपवण्याची भाषा करत आहेत. ते पुढे म्हणाले की कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली.
 
सापाचे उमेदवार अबू आझमी यांनी म्हटले की महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अवधी दिल्यास ते 10 दिवसात अमली पदार्थाचे व्यसन थांबवू शकतात. 

नवाब मलिक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सपा मधून केली असून 1996 मध्ये नवाब मलिक यांनी अबू आझमी  यांच्या नेतृत्वाखाली नेहरू नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. नंतर 2001 मध्ये सपाने नवाब मलिक यांना निलंबित केले. यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 आणि 2019 च्या निवडणुकीत अणुशक्ती नगर मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली, राजकारणाविरोधात मोहीम सुरू करणार

सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

SKIMS India: किम कार्दशियनचा ब्रँड दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर्ससह भारतात प्रवेश करणार

पुढील लेख
Show comments