Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐतिहासिक भव्यता आणि सौंदर्याने नटलेला; समुद्रात उभा अलिबागच्या 'अष्टागराचा राजा' कुलाबा किल्ला

Updated: सोमवार, 25 मे 2026 (21:02 IST)
भरतीच्या वेळी पूर्णपणे समुद्राने वेढले जाते.
 
किल्ल्याची मुख्य वैशिष्ट्ये आणि आकर्षणे
भरती-ओहोटीचे गणित: कुलाबा किल्ला हा पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात आहे. ओहोटी असते तेव्हा समुद्राचे पाणी ओसरते आणि किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी कोरडा रस्ता तयार होतो. भरतीच्या वेळी हा रस्ता पूर्णपणे पाण्यात बुडतो.
 
गोड्या पाण्याच्या विहिरी: हा किल्ला चारी बाजूंनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेला आहे, तरीही किल्ल्याच्या आत गोड्या पाण्याच्या विहिरी आहे, ज्यांचे पाणी आजही पिण्यायोग्य आहे. हे प्राचीन स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.
 
सिद्धीविनायक मंदिर (सुवर्ण पंचायतन): किल्ल्याच्या आत १७५९ मध्ये राघोजी आंग्रे यांनी बांधलेले एक सुंदर गणपती मंदिर आहे. येथील गणपतीची मूर्ती अत्यंत आकर्षक असून आजही स्थानिक कोळी बांधव आणि पर्यटक येथे मोठ्या श्रद्धेने येतात.
ALSO READ: महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक प्राचीन देवगिरी किल्ला दौलताबाद
ऐतिहासिक तोफा आणि अवशेष: किल्ल्याच्या तटबंदीवर आणि बुरुजांवर आजही इंग्रज व मराठा कालीन तोफा पाहायला मिळतात. तसेच प्राण्यांची-पक्ष्यांची चित्रे कोरलेले दगड आणि जुन्या दारूगोळा कोठारांचे अवशेष येथे आहेत.
 
कुलाबा किल्ल्याला भेट कशी द्यावी? 
समुद्राची वेळ: किल्ल्यावर जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवर भरती-ओहोटीची (Tide Timings) वेळ नक्की तपासून घ्या. तुम्ही अलिबाग बीचवरून साधारण १५ ते २० मिनिटे चालत किंवा तिथल्या प्रसिद्ध घोडागाडीने समुद्राच्या वाळूतून सहज किल्ल्यावर जाऊ शकता.
 
भरतीच्या वेळी: पायवाट पाण्यात बुडते, त्यामुळे फक्त बोटीनेच जावे लागते. पाणी जास्त वाढल्यास तिथे जाणे पूर्णपणे बंद केले जाते.
 
सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत (किंवा ओहोटीच्या वेळेनुसार) हा किल्ला पाहता येतो. पूरातत्व विभागाच्या गाईड्सची (मार्गदर्शक) सुविधाही आता उपलब्ध आहे जी तुम्हाला संपूर्ण इतिहास सांगू शकते.
ALSO READ: छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला
भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ
नोव्हेंबर ते फेब्रुवारी (हिवाळा) हा काळ सर्वात उत्तम आहे. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) समुद्र खवळलेला असल्याने येथे जाणे सुरक्षित नसते आणि बंदी असते. अलिबागला गेल्यानंतर समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासोबतच कुलाबा किल्ल्याची ही ऐतिहासिक सफर नक्की अनुभवण्यासारखी आहे!
ALSO READ: भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

रणबीर कपूरचा 'रामायणम्' प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला, रामलीला महासंघाचा इशारा; आधी आम्हाला चित्रपट दाखवा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

Meghalaya Tourism ईशान्य भारतातील निसर्गरम्य राज्य! मेघालय

कंगना रणौत हृतिक रोशनवर संतापली, पार्टनरला लाजिरवाणे करणे थांबवा म्हणाली

अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments