Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्रामगड अर्थात पट्टा किल्ला

Updated: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (09:39 IST)
 
देवीची साडी हिरव्या रंगाची असून चोळी लाल रंगाची आहे. अंबा देवीच्या बाजूला लिंबा देवीची उभी मूर्ती आहे. देवीचा उजवा हात आशीर्वाद देणारा असून डाव हातात कमळ आहे. या मूर्तीची स्थापना 1672 ते 1675 या दरम्यान झाली. छत्रपती शिवाजी महाराज जालनच्या लढाईत विजयी होऊन विश्रंतीसाठी 15 दिवस या गडावर राहिले. त्यामुळे या गडाला विश्रामगड हे नाव पडले.
 
विश्रामगडाला पायर्‍या नसल्याने डोंगरातील पायवाटेने जावे लागते. तेथील परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी या ठिकाणी छत्रपती शहाजीराजे यांच्या राजधानीचे प्रमुख ठिकाण होते. बाजूला हरिश्चंद्रगड असून त्यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच तिरडे या प्रदेशालाही पुराणकाळापासून महत्त्व आहे.
 
सीतेचे रावणाने अपहरण केलनंतर जटायू पक्षी तेथे आला आणि रावणाने त्याला ठार केले. तेव्हा तो जिथे पडला तेथे त्याच्या पंखांचा आकार उमटला आहे. तसेच सीता प्रभू रामचंद्रांच्या विोगाने जेथे रडत बसली त्या ठिकाणाला तिरडे असे नाव पडले.
 
पुढे भंडारदरा हे इंग्रजांच काळातील धरण आहे. विश्रामगडाचा परिसर निर्जन आहे. गडावर आणि परिसरात माकडे पाहावास मिळतात. तेथे सायंकाळी वाघ येतात आणि देवीच्या देवळात जाऊन बसतात. देवीच्या मंदिराला दरवाजा तसेच विजेची सोय नाही.
 
तेथील कळस पावसाळत गळतो. पावसाळ्यात जोरदार पाऊस असल्याने जाणे कठीण आहे.
 
लिंबा देवीचा उजवा आशीर्वाद देणारा हात कोपरापासून तुटून मूर्ती खंडित झाली आहे. तेथे गडावर पूर्वी लक्ष्ममहाराज नावाचे वैद्य राहायचे. तेथे त्यांचा  दवाखाना होता. तो आजही पाहावास मिळतो. देवीच्या मंदिरात जाताना अभिषेक करायचा असल्यास सर्व साहित्य न्यावे लागते. शिवकालीन पाणीसाठा अद्याप सुस्थितीत आहे.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

वीकेंड ट्रिपसाठी पुण्याजवळील कमी प्रसिद्ध पण ५ सुंदर ठिकाणे

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

Lock Upp 2: हर्षद चोप्रा पहिला फायनलिस्ट ठरला, शिवांगी जोशी धक्कादायक एलिमिनेशनला सामोरे गेली

पुढील लेख
Show comments