Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरेंना नामी संधी

Updated: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (11:44 IST)
 
आता दोन्ही कॉंग्रेसला मध्यावधी का हवी असेल? शिवसेनेला मुख्यमट्रीपदाचं गारज दाखवत केंद्रातील मंत्रीपद सोडायला लावलं, युती तोडायला लावली. भाजपा खूप संरक्षित खेळ खेळतेय. त्यांनी युती तोडली नाही, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मागितला नाही. मागे युती तुटली त्याचंही खापर (योग्य की अयोग्य यात नको पडूया) शिवसेनेवरच फुटलं. आता युती तोडल्यानंतर सरळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने अनुमती पत्र द्यावं की देऊ नये? आजच्या डिहीटल युगात ते पत्र फॅक्सही करता येतं. पण दोघांनी तसं केलं नाही. सेनेला राजभवनात जाऊ दिलं आणि त्यांचा पचका झाला. आता दोन्ही कॉंग्रेसला मध्यावधी का हवी असेल? कारण आता जर मध्यावधी झाली तर सेना भाजप वेगळे लढतील आणि आघाडी एकत्र. त्यामुळे राज्यात आघाडीचे वर्चस्व येऊ शकेल अशी दोन्ही काँग्रेसला आशा असावी. ते वर्चस्व निर्माण होईल की नाही हाही प्रश्न आहे. कारण भाजप काही गप्प बसेल असं वाटत नाही. सेना युतीतून बॅकआउट झाल्यावर भाजपला मताधिक्य वाढवण्यासाठी अजून दोन पर्याय आहेत. बाळासाहेब आंबेडकर आणि राज ठाकरे. यात राज ठाकरेंचा चांगला वापर होऊ शकतो. सेनेने फारकत घेतलीच असेल तर सेनेला आव्हान देण्यासाठी राज ह्यांच्यापेक्षा दुसरा हुकुमाचा एक्का कोण असू शकतो? दोन्ही भावंड समोरासमोर एकमेकांविरोधात उभी राहिली की गेम चेंज होऊ शकतो. पवार साहेबांनी राजना मोदींच्या विरोधात उभं केलं म्हणून फारसा फरक पडला नाही. कारण मोदींना वोट देणारे वोटर्स वेगळे आहेत, ते राज ह्यांचं का ऐकतील. पण शिवसेनेच्या समोर राजना उभं केलं तर खूप मोठा फरक पडू शकतो. आजही असे काही शिवसेनेचे मतदार आहेत, जे राज ह्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. हाताच्या बोटावर मोजले जाणार्‍या अशा काही मतदारांना मी ओळखतो, त्यांना मोदींना बोललेलं आवडत नाही, पण ते शिवसेनेचे मतदार आहेत. कारण मोदी आणि सेना हिंदुतव्वादी आहेत. त्यांना असंही वाटतं की राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. हा वर्ग राज ठाकरेंकडे पर्यायाने भाजपाकडे वळू शकतो आणि मताधिक्य वाढू शकतं.
 
उलट मी तर म्हणेन राज ह्यांच्यासाठी ही नामी संधी आहे. तसंही त्यांचं राजकीय अस्तित्व नाही. मनसे हा कुटुंबवादी पक्ष आहे, त्यांच्यानंतर (पुढे जर पक्ष टिकला तर) अमितच अध्यक्ष असेल यावर कुणीच वाद घालणार नाही. म्हणून राज ह्यांनी भविष्यासाठी हा विचार करायला हरकत नाही. एकला चलो रे ने राज ह्यांचं भलं झालं नाही, मोदींना शिव्या घालून असलेलं बळही ते गमावून बसले आहेत. आता पक्षाला संजीवनी मिळवण्यासाठी भाजपसोबत महायुतीत सहभागी होऊ शकतात. शिवसेने इतक्या जागा वाटप होणार नाही. पण समजा १५ जागा जरी मिळाल्या आणि त्यातले ८ आमदार जरी निवडून आले तरी मनसेचा फायदाच आहे. उलट एखादं मंत्रीपदही मिळू शकेल राज्यात. आता या अंदाजाची शक्यता उद्या काय होणार यावर आहे. उद्या राष्ट्रवादी सरकार स्थापन कर शकली नाही तर राष्ट्रपती राजवट, मध्यावधीला पर्याय नाही असं प्रथमदर्शनी तरी दिसतंय आणि मध्यावधी झाली. शिवसेनेसोबत युती झाली नाही तर राज हा उत्तम पर्याय आहे. पण भाजपाला राज ह्यांची जितकी गरज आहे, त्याहीपेक्षा १०० पट जास्त राजना भाजपची गरज असली पाहिजे. ही नामी संधी राज ह्यांनी सोडू नये आणि जर शिवसेना हा पक्ष शत्रू म्हणून समोर उभा असेल तर राज ह्यांना समोर ठेवत त्या पक्षाशी दोन हात करता येतील. यामुळे होईल असं की फडणविस दोन्ही कॉंग्रेसवर लक्ष केंद्र करु शकतील आणि राज शिवसेनेवर. असो... पुढचं पुढे...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: गणेशोत्सवापूर्वी कोकणला भेट म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुंबई-सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

विरोध का? अभिजीत दीपके यांनी 'शाळा सुधारा' मोहिमेवरून भाजपवर निशाणा साधला

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अभिनंदन वर्धमान यांनी हवाई दल सोडले, मेजर ऋषभ संब्याल यांचीही मुदतपूर्व निवृत्ती

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; इराणसोबतचे युद्ध जास्त काळ टिकणार नाही

पुढील लेख
Show comments