suvichar

९,७६०कोटी रुपयांच्या २००० च्या नोटा परतल्याच नाही!

शनिवार, 2 डिसेंबर 2023 (12:10 IST)
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने २ हजारांच्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत आरबीआयकडे किती नोटा परत आल्या, याबाबत माहिती समोर आली आहे. आरबीआयने एका निवेदनात सांगितले की, १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटांपैकी ९७.२६ टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत. १९ मे पर्यंत ३.५६ लाख कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटा चलनात होत्या. अद्याप ९,७६० कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटा परत आलेल्या नाहीत.
 
आरबीआयने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. बँकेने यामागे क्लीन नोट पॉलिसीचा हवाला दिला होता. मात्र, २००० रुपयांची नोट अवैध ठरवली नव्हती. यानंतर २००० रुपयांच्या नोटा परत करण्यासाठीकिंवा बदलण्यासाठी सुमारे ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. सुरुवातीला ३० सप्टेंबर अंतिम तारीख ठेवण्यात आली होती. नंतर ती ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. तोपर्यंत नोटा कोणत्याही बँक किंवा आरबीआयच्याच्या १९ इश्यू ऑफिसमध्ये बदलल्या जाऊ शकतात.
 
आता नोटा कशा बदलल्या जात आहेत?
आता तुम्ही आरबीआयच्या १९ इश्यू ऑफिसमधून २००० रुपयांच्या नोटा पाठवू शकता. ही कार्यालये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये आहेत. याशिवाय तुम्ही या नोटा भारतीय पोस्टद्वारे आरबीआय कार्यालयात पाठवू शकता. या प्रक्रियेसाठी सोबत वैध ओळखपत्र, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असावे. नोट जमा केल्यानंतर ते मूल्य तुमच्या खात्यात दिसू लागेल.
 
२००० च्या नोटा का बंद केल्या?
२००० रुपयांची नोट क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत डिक्रिक्युलेट करण्यात आली होती. २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर बाजारात रोखीची कमतरता भरून काढण्यासाठी त्या आणल्या गेल्या. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे बाजारात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला होता. पण ५०० रुपयांच्या आणि इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात बाजारात आल्यावर २००० रुपयांच्या नोटेचे कामही संपले. त्यामुळे २०१८-१९ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. २००० रुपयांच्या नोटा अजूनही वैध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कठोर कारवाईची घोषणा केली

LIVE: धर्मांतर आणि महिलांच्या छळाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन होणार

महाराष्ट्रात धर्मांतर आणि महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाणार

कॅफेमध्ये कट रचला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा; केतनची हत्या एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखी

२७-२८ जूनच्या रात्री कल्याण-बदलापूर सेक्शनवर मेगा ब्लॉक लागणार

पुढील लेख
Show comments