Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

९,७६०कोटी रुपयांच्या २००० च्या नोटा परतल्याच नाही!

Updated: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (12:14 IST)
 
आरबीआयने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. बँकेने यामागे क्लीन नोट पॉलिसीचा हवाला दिला होता. मात्र, २००० रुपयांची नोट अवैध ठरवली नव्हती. यानंतर २००० रुपयांच्या नोटा परत करण्यासाठीकिंवा बदलण्यासाठी सुमारे ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. सुरुवातीला ३० सप्टेंबर अंतिम तारीख ठेवण्यात आली होती. नंतर ती ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. तोपर्यंत नोटा कोणत्याही बँक किंवा आरबीआयच्याच्या १९ इश्यू ऑफिसमध्ये बदलल्या जाऊ शकतात.
 
आता नोटा कशा बदलल्या जात आहेत?
आता तुम्ही आरबीआयच्या १९ इश्यू ऑफिसमधून २००० रुपयांच्या नोटा पाठवू शकता. ही कार्यालये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये आहेत. याशिवाय तुम्ही या नोटा भारतीय पोस्टद्वारे आरबीआय कार्यालयात पाठवू शकता. या प्रक्रियेसाठी सोबत वैध ओळखपत्र, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असावे. नोट जमा केल्यानंतर ते मूल्य तुमच्या खात्यात दिसू लागेल.
 
२००० च्या नोटा का बंद केल्या?
२००० रुपयांची नोट क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत डिक्रिक्युलेट करण्यात आली होती. २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर बाजारात रोखीची कमतरता भरून काढण्यासाठी त्या आणल्या गेल्या. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे बाजारात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला होता. पण ५०० रुपयांच्या आणि इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात बाजारात आल्यावर २००० रुपयांच्या नोटेचे कामही संपले. त्यामुळे २०१८-१९ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. २००० रुपयांच्या नोटा अजूनही वैध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईला मंजुरी दिली, भेसळ करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई होणार

Rishabh Pant ने रचला इतिहास! कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

गणेशोत्सवाला UNESCOचा दर्जा मिळणार? महाराष्ट्र सरकारच्या मोठ्या प्रयत्नांची चर्चा

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने जाणून घ्याव्यात या ७ कायदेशीर गोष्टी; तुमचे अधिकार काय?

LIVE: मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या३,२७७ च्या पार

पुढील लेख
Show comments