Dharma Sangrah

24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या

शनिवार, 2 डिसेंबर 2023 (11:33 IST)
Make reservations by December 24 जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत.  जरांगे यांनी जालन्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या आणि सर्व गुन्हे मागे घ्या अन्यथा चर्चेला येऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले.
 
आम्ही ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, तुम्हाला जे काय करायचे ते करा. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर तुम्हाला बाथरुमदेखील उघडता येणार नाही. लक्षात ठेवा. मराठा समाजासोबत दगा केल्यास तुम्हाला सुटी नाही. भुजबळांच्या दबावाखाली येवून मराठा समाजाचे वाटोळे करु नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तुम्हाला शेवटची विनंती आहे. छगन भुजबळ यांच्या दबावात येऊन तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिले नाही आणि मराठ्यांचा घात केला तर तुमची गाठ महाराष्ट्रातील मराठा समाजाशी आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
 
२ तारखेला एक महिना पूर्ण होत आहे. अंतरवालीतील गुन्हे दोन दिवसांत आणि महाराष्ट्रातील सर्व गुन्हे दोन महिन्यात मागे घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून एका महिन्यात ४ लोक आले. उदय सामंत, धनंजय मुंडे, संदिपान भुमरे, अतुल सावे आले. यांनी गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र अंतरवालीतील कार्यकर्त्यांना का अटक केली, खोटे बोलून गद्दारी करू नका, असे जरांगे पाटील म्हणाले. अंतरवालीत प्राणघातक हल्ला आम्ही विसरलो नाही. आम्हाला सर्वांना अटक करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा, असेही जरांगे म्हणाले.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

कमी खर्चात भरपूर नफा मिळवून देणारा एक उत्तम शेती व्यवसाय; गवारीच्या शेंगाची लागवड

LIVE: महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार!

केतन अग्रवाल हत्या प्रकरण: आरोपी सिया गोयल आणि प्रियकराने तीन वेळा हत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली

ममता बॅनर्जी यांनी पक्षातून ८ नेत्यांना काढून टाकले; बंडखोरांनी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली?

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार! फडणवीस सरकारने विधानसभेत मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments