Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोमॅटोमुळे सोन्याचे दिवस..! शेतकरी दाम्पत्य दिवसाला करतंय तब्बल 18 लाखांची कमाई

Updated: गुरूवार, 13 जुलै 2023 (20:58 IST)
 
टोमॅॅटो मुळे जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. टोमॅटोमधून त्याला जणू काही लॉटरीच लागली आहे. जुन्नर तालुक्यातील एका शेतकरी दाम्पत्याचं या टोमॅटोने कोट्याधीश बनवले आहे. ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.
 
जुन्नर तालुक्यातील पाचघर हे गाव पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. मुबलक प्रमाणात पाणी असल्याने या गावाचा कायापालट झाला आहे. या गावातील तुकाराम भागोजी गायकर हे शेतकरी याच गावात राहणारे. त्यांची परंपरागत शेती आहे. या भागात जवळपास १८ एकर क्षेत्र बागायती आहे. त्यापैकी बारा एकर क्षेत्रावर गायकर यांचा मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली गायकर शेती बघतात. ते दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करतात. मात्र यंदाच्या वर्षी लावलेल्या टोमॅटोने त्यांना करोडपती बनवले आहे.
 
गायकर यांना टोमॅटो विक्रीसाठी पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मार्केट जवळ आहे. त्यामुळे ते तिकडे टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जातात. आतापर्यंत त्यांनी महिनाभरात जवळपास १३ हजाराहून अधिक टोमॅटो क्रेट विक्री केले. असून त्यातून त्यांना सव्वा कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी एकच दिवशी ९०० क्रेटची विक्री केली त्यातून त्यांनी एकच दिवशी १८लाख रुपये मिळाले आहेत. ते सात वर्षांपासून टोमॅटो लागवड करतात.
 
गायकर दाम्पत्याला मागच्या महिनाभरात त्यांच्या शेतातील टोमॅटोच्या क्रेटला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तालुक्यातील टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यानं महिनाभरात बाजार समितीची जवळपास ८० कोटींहून अधिकची उलाढाल झाली आहे.
 
यंदाच्या वर्षी टोमॅटोने शेतकऱ्यांना तारले आहे. यामध्ये गायकर दाम्पत्य देखील करोडपती बनलंय. चांगल्या टोमॅटोला नारायणगाव मार्केट येथे सर्वांत उच्चंकी म्हणाजे २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाला आहे.
 
यंदाच्या वर्षी टोमॅटो बागांची मशागत ,तोडणी, क्रेट भरणे, फवारणी यांचे व्यवस्थापन ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर यांनी केले होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन तर चांगले बसलेच पण या टोमॅटोमुळे जवळपास १०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

LIVE: गणेशोत्सवापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा अंतरिम आदेश कायम ठेवला

रिक्षा - टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून अनिवार्य! सरकार कारवाई सुरू करणार

Gen Z यांच्या प्रेम आणि नातेसंबंधांवर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे शब्द, 'सिच्युएशनशिप' ते 'सोलमेट'पर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार, सामना सकाळी किती वाजता सुरू होणार?

पुढील लेख
Show comments