कज्यूमर प्राइस इंडेक्सवर आधारित या अहवालात एसबीआयने जन धन खात्यामुळे आणि नोटबंदीमुळे नागरिकांचा बचत करण्याकडे अधिक कल असल्याचे म्हटले आहे. ज्या राज्यात जन धन खाती अधिक उघडण्यात आली आहेत, अशा राज्यात मद्य आणि तबांखूच्या विक्रीमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येते. नोटबंदीनंतर खर्च कमी करून अधिक बचत करण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसते. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात ऑक्टोबर 2016पासून वैद्यकीय खर्च वाढल्याचे एसबीआयने म्हटले आहे.