Dharma Sangrah

कांदा पेटला, होणार अजून महाग, शेतकरी वर्गाने थांबवले लिलाव

Updated: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (10:36 IST)
 
दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको केला तर बाजार पेठेत विक्रीस आणलेला कांदा शेतकरी पुन्हा परत घेवून गेले आहे. जो पर्यंत निर्यात बंदी व इतर जाचक अटी सरकार काढणार नाही, व शेतकरी हिताचे निर्णय घेणार नाही तो पर्यंत बाजारात कांदा विक्री करणार नाही असा निर्धार शेतकरी वर्गाने घेतला असून, विशेष म्हणजे कोणतीही संघटना किंवा राजकीय पक्ष मागे उभा नसतांना हे तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
 
देशातील कांद्याच्या वाढत्या दराना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय रविवारी जारी केला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रकही जारी केले होते. कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ लागू केला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानंतर या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे बोलले जात होते. त्यांचे परिणाम सोमवारी दिसून आले आहेत.
 
कांद्याचे भाव घसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये लिलाव बंद पाडला. तसेच निफाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे.देशातील कांद्याच्या वाढत्या दराना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय रविवारी जारी केला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले होते. कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ लागू केला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानंतर या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना असल्याचे बोलले जात होते. त्यांचे परिणाम सोमवारीच दिसून आले आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर बलात्काराचा आरोप

बंगळूरमधील ९० रुग्णालयांना कर्करोगाची बनावट औषधे पुरवली जात असून, ५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला

गुरुग्राममध्ये एका महिला दुचाकीस्वाराला धडक देणारी गाडी लष्कराच्या एका जवानाची असल्याचे निष्पन्न झाले

मनोज जरांगे मुंबईत एकट्याने आंदोलन करणार; १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आझाद मैदानाकडे रवाना होणार

मनोज जरांगे भावूक; ‘ही माझी शेवटची भेट असू शकते’ म्हणत उद्या परवानगीशिवाय मुंबईकडे रवाना होण्याचा निर्धार

पुढील लेख
Show comments