संबंधित माहिती
- कांदा भाव पडले, कमावलेले ६ रुपयांची मनीऑर्डर शेतकऱ्याने दिली मुख्यमंत्री यांना
- आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
- लक्ष्मीपूजनपासूनच्या मुहूर्तावर नाशिक-पुणे विमानसेवा सुरु होणार
- मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचा नवीन नियम ११ नोव्हेंबरपासून लागू होईल, फक्त 5.74 रुपये MNP साठी द्यावे लागतील
- BSNLचा खासगी कंपन्यांना प्रतिसाद, या स्वस्त योजनांमध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध होईल
कांदा निर्यातीवर बंदी
सणासुदीच्या काळात गगनाला भिडू पाहणारे कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा आणली. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव कमी व्हावेत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं. केंद्राने 50 हजार टन कांद्याचा राखीव साठाही उपलब्ध करून दिला आहे.
कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने किरकोळ दुकानदारांना 100 क्विंटल तर घाऊक विक्रेत्यांना 500 क्विंटल कांद्याचा साठा करण्याची मर्यादा घालून दिली असल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं.
