Marathi Biodata Maker

आजचा सामना भारतासाठी करो या मरो

गुरूवार, 18 मार्च 2021 (09:16 IST)
भारतीय क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्ध चौथी टी-20 सामना खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी आजची लढत ‘करो या मरो’ अशी असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्‍या चौथ्या लढतीत भारताला विजय मिळवावाच लागेल.
 
मालिकेतील तीन पैकी दोन सामन्यात भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आता इंग्लंडविरुद्ध भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.  आतापर्यंत ज्या संघाने नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग केला आहे त्यांना विजय मिळवता आला. भारताचा कर्णधार विराट कोहली चांगली कामगिरी करण्यावर भर देत असतो. पण आगामी टी-20 विश्‍वचषकाचा विचार करता लक्ष्याचा पाठलाग असो वा प्रथम फलंदाजी दोन्ही वेळा चांगली कामगिरी करून विजय मिळवणे गरजेचे आहे.
भारतीय संघाचा ज्या दोन लढतीत पराभव झाला त्या दोन्ही लढतीत संघाला पॉवर प्लेमध्ये धावा करता आल्या नाहीत. ज्याचा परिणाम अंतिम धावसंख्येवर झाला. या दोन्ही लढतीत अनुक्रमे श्रेयस अय्यर व विराट कोहली यांच्या फलंदाजीमुळे भारत धावा करू शकला. के. एल. राहुलच्या खराब फलंदाजीचा तोटा भारतीय संघाला झाला. पण विराट कोहलीने तोच सलामीचा फलंदाज असेल, असे स्पष्ट केले आहे. 
 
तिसर्‍या सामन्यातील पराभवानंतर आता टीम इंडियामध्ये चौथ्या सामन्यात आणखी एका अष्टपैलूला स्थान दिले जाऊ शकते. हार्दिक पंड्या व वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत पदार्पणाची प्रतीक्षा करणारे राहुल तेवतीया किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

IND vs ENG: इंग्लंडने भारताविरुद्धची आपली पहिली २+ सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली

भारत व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंडचे लक्ष्य अव्वल स्थान पटकावण्याचे असेल

झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशला पराभूत करून मोठा उलटफेर घडवला

सलग पाच टी-२० सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम

इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारताचा सलग तिसरा पराभव

पुढील लेख
Show comments