Festival Posters

आधार कार्ड वापरत नसाल तर होईल डिअॅक्टिवेट, जाणून घ्या UIDAI चे नियम

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड कागदपत्र नाही तर ओळख पत्र देखील आहे. कोणत्याही वित्तीय देणंघेणं आणि शासकीय योजनांचा लाभ 
 
घेण्यासाठी आधार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आधार कार्डाचा एक नियम आपल्यासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 
 
UIDAI अनुसार, जर एखादा नागरिकाने तीन वर्षांपर्यंत आपला आधार वापरले नाही तर आधार डिअॅक्टिवेट अर्थात बंद होईल.
 
जाणून घ्या नियम
यूआईडीएआई अनुसार जर तीन वर्ष आधार वापरले नाही तर आधार कार्ड बंद करण्यात येतं. आधार कार्ड आपण शासकीय स्कीम्सचा लाभ घेण्यासाठी, पेन्शन सुविधेचा लाभ घेण्यासाठी, ईपीएफओ डिटेल्स देण्यासाठी, पॅन कार्डला लिंक करण्यासाठी व इतर कामांसाठी वापरू शकता.
 
आपला कार्ड निष्क्रिय तर झाला नाही
आपण घरी बसल्या आपल्या आधार कार्डाचे स्टेटस तपासू शकता. यासाठी आपल्याला यूआईडीएआई च्या वेबसाइटवर विजिट करावं लागेल. uidai.gov.in यावर क्लिक करून आपला आधार सर्व्हिसेज पर्याय निवडा, नंतर 'वेरिफाय आधार नंबर' वर आपला आधार नंबर टाका. आपण आधार नंबर टाईप केल्यावर आपल्या समोर हिरवा किंवा लाल रंगाचा चिन्ह येईल. चिन्ह हिरवा असल्यास आधार अॅक्टिवेट आहे आणि लाल रंगाचा चिन्ह दिसल्यास आधार कार्ड डिअॅक्टिवेट झाला आहे.
 
या प्रकारे करा अॅक्टिवेट
आपला आधार कार्ड डिअॅक्टिवेट आहे आणि आपण याला पुन्हा अॅक्टिवेट करू इच्छित असाल तर आपल्याला सर्व आवश्यक डाक्युमेंट्ससोबत आधार एनरोलमेंट सेंटर जावं लागेल. तेथे जाऊन आपल्याला आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल, नंतर बायोमेट्रिक वेरिफाय केलं जाईल. नंतर आपला आधार अॅक्टिवेट होईल. यासाठी आपल्याला फीस देखील भरावी लागेल. 
 
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला एनरोलमेंट सेंटर मध्ये 50 रुपये द्यावे लागतील. या व्यतिरिक्त या प्रक्रियेत आपल्याला आपला एक वैध मोबाइल नंबर देखील द्यावा लागेल.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

कार थेट २० फूट खाली कोसळली! मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघलेल्या माय-लेकीचा जागीच दुर्दैवी मृत्यू

LIVE: राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्

बारावीत ७५% पेक्षा कमी गुण मिळवलेल्यांनाही आयआयटीमध्ये प्रवेश मिळेल, आयआयटी रुरकीचा नवा नियम

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

राजेश एक्सपोर्ट्सच्या महाघोटाळ्यात LIC चा निधी अडकला; सामान्य गुंतवणूकदारांची कष्टाची कमाई धोक्यात?

पुढील लेख
Show comments