Marathi Biodata Maker

अर्णब गोस्वामींवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम...

Updated: गुरूवार, 30 एप्रिल 2020 (16:41 IST)
 
काँग्रेसजनांनी आपल्या नेत्यावर अर्णब गोस्वामी यांनी टीका केली म्हणून त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला. मात्र याच काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपतील नेते दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही किती खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती याचा विसर काँग्रेसजनांना पडला असेलही मात्र जनसामान्य ही टीका अद्याप विसरलेले नाहीत. आपल्यापेक्षा वयाने बरेच ज्येष्ठ असलेल्या आणि पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या  व्यक्तीचा एकेरीत उल्लेख करीत चौकीदार चोर है अशा घोषणा देत काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष देशभर फिरत होते.फक्त कांँग्रेस अध्यक्षच नाही तर त्यांचे लहान मोठे कार्यकर्तेही हेच करीत होते. मग हाही देशद्रोह म्हणायचा का याचे उत्तर कपिल सिब्बल यांनी द्यायला हवे. हे फक्त एक उदाहरण झाले. अशा अनेक प्रकरणांमध्ये भाजपच्या प्रत्येक टप्प्यावरील नेत्यांवर अशा प्रकारचे घाणरडे आरोप करीत हे काँग्रेसजन फिरत होते. म्हणजेच आम्ही केले ते बरोबर तुम्ही मात्र कोणत्याही चुका करायला नको हीच या काँग्रेसजनांची अपेक्षा आहे. आम्हाला कोणत्याही थराला जाऊन टीका करण्याचा अधिकार आहे. तुम्ही मात्र तो अधिकार वापरता कामा नये. आम्ही केली तर श्रावणी, तुम्ही खाल्ले ते शेण अशा भूमिकेतून काँग्रेसजन आजच नाही तर पूर्वीपासून वागत आलेले आहेत. 
फक्त काँग्रेसजनच नाही तर अनेक माध्यमेही याच पद्धतीने वागताना दिसत आहेत. पालघरमध्ये सांधूंची हत्या झाली हे साधू हिंदू होते. जर हे इतर धर्माचे असते तर मोदी सरकारविरोधात देशातील सर्व पुरोगामे माध्यमे तुटून पडली असती. अनेक पुरोगामी विचारवंतांनी आता भारतात आम्हाला सुरक्षित वाटत नाही असा कांगावाही केला असता. काही कथित विद्ववान मंडळी पुन्हा एकदा पुरस्कार वापस करण्याचे नाटक करायला धावली असती. मात्र यावेळी सर्वच माध्यमे शांत आहेत. एखाद्या डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रावर किंवा वाहिनीवर एखाद्या वृत्तासाठी गुन्हा दाखल झाला तर ही माध्यमे आणि त्यांच्या संघटना या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे म्हणून ओेरड करतात. इथे एका पत्रकाराच्या विरोधात दोन दिवसात अगदी मोहिम चालवून 200 पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल करून दबावतंत्र वापरले जाते तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत नाही काय? मात्र याचे उत्तर हे कथित पुरोगामी पत्रकार देणार नाहीत.
 
अर्णब गोस्वामींवर अशा प्रकारे गुन्हे दाखल झाले याचा खरेतर माध्यमांनी आणि त्यांच्या संघटनांनी पुढे येऊन निषेध करायला हवा होता. एरव्ही काहीही झाले की आधी म्हटल्याप्रमाणे गळे काढणारे माध्यम संघटनांचे प्रमुख आज शांत आहेत. कारण या संघटनांचे प्रमुख हे काँग्रेसधार्जिणे आहेत. एडीटर्स गिल्ड या संघटनेने या मुद्यावर मूग गिळून बसणे हेच श्रेयस्कर मानले आहे. प्रेस कौन्सिलने नाही म्हणायला गोस्वामींवरच्या हल्ल्याचा निषेध केला मात्र गोस्वामींनीही चुकीच्या पद्धतीने टीका केल्याचा ठपका ठेवला आहे. म्हणजे तिथेही काँग्रेसचे लांगुलचालन आलेच.
 
आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्ष हे काचेच्या घरात आहेत. हे वास्तव नाकारता येत नाही. जर आपण कोणावर दगड मारला तर आपल्यावरही दगड येणारच याची जाणीव प्रत्येकानेच ठेवायला हवी. आपण समोरच्याकडे एक बोट दाखवले तर तीन बोटे आपल्याकडे येतात याचे भान टीका करताना ठेवायला हवे. मात्र आम्ही ते ठेवत नाही हे दुर्देव म्हणावे लागेल.
 
माध्यमांची लोकशाहीतील जबाबदारी मोठी असते. त्यांनी निष्पक्ष वृत्तसंकलन करणे अपेक्षित असते. मात्र आजची माध्यमे कोणाच्यातरी दावणीला बांधून आपले वृत्तसंकलन किंवा वृत्तविषयक चर्चात्मक कार्यक्रम करीत आहेत हे कार्यक्रम बघतानाच वारंवार जाणवते. अर्णब गोस्वामींनी खालच्या पातळीवर टीका केली असे म्हणणारे पत्रपंडित जेव्हा मोदींवर एकेरीत टीका करतात किंवा मग देवेंद्र फडणवीसांना मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवण्याचा सल्ला आपल्या अग्रलेखात देतात तेव्हा त्यांच्या टीकेचा हा कोणता दर्जा म्हणायचा? अनिल देशमुखांवर टीका केली म्हणून भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णींवर जागोजागी गुन्हे दाखल केले जातात. त्याचवेळी सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचे पोपट असलेली वृत्तपत्रे कशापद्धतीने टीका करतात हे करणार्यांना आणि त्यांच्या समर्थकांना दिसत नसेलही मात्र जनसामान्य हे उघड्या डोळ्याने बघत असतात.
 
जर गोस्वामींनी खरोखरी सोनिया गांधींचा अवमान केला असे वाटले म्हणून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असता तर ती विधीसंमत प्रक्रिया मानता आली असती. एखाद्या ठिकाणी गुन्हा दाखल करणे हे देखील विधीसंमत मानले असते. मात्र 200 ठिकाणी गुन्हे दाखल करणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करणे हे विधीसंमत मार्ग नाहीतच पण त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोचही आहे हे वास्तव नाकारता येत नाही.
 
हे सर्व बघता काँग्रेसने आता हतबल होऊन विरोधकांवर आक्रमक होणे सुरु केले आहे हे स्पष्ट दिसते. कधी नव्हे ते गेली 6 वर्षे त्यांना सत्तेबाहेर राहावे लागले आणि आज किमान 2024 पर्यंत तर राहावे लागणारच आहे अशावेळी तोल सुटून बेभान झाल्यागत ते वागत आहेत. याचा जनसामान्यांवर प्रभाव टाकण्यासाठी फायदा होईल असे त्यांना वाटत असेलही मात्र तो त्यांचा भ्रम ठरेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच या देशातील सुजाण नागरिक कधीच मान्य करणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवायलाच हवे. 
 
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही तर समजून घ्या राजे हो.....
ता.क. : घ्या समजून राजे हो या लेखमालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील. 
- अविनाश पाठक 
मो.9096050581

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

कॉमनवेल्थ गेम्स 2026 ला आजपासून सुरुवात; उद्घाटन सोहळा कधी होणार? जाणून घ्या..

भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० मालिकेचा पहिला सामना आज हरारे येथे खेळला जात आहे

LIVE: "बॅगेत ड्रग्ज ठेवून आत टाकेन!", आंदोलक विद्यार्थ्यांना अडकवण्याची धमकी देणारा पोलीस कर्मचारी निलंबित

CJP आंदोलन: राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

अवघ्या ४.५ लाखांत येतेय 'ही' भन्नाट ५-सीटर फॅमिली इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये २५० किमीची रेंज

पुढील लेख