Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नको बोलघेवडेपणा

Updated: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (08:17 IST)
 
सुजय ऑफिसमध्ये कामासाठी जातो. पण, तो तेथे प्रत्यक्ष काम करण्याऐवजी इकडच्या गोष्टी तिकडे पसरवणे आणि त्याला मीठ-मसाला लावून त्या इतरांना सांगणे एवढे एकच काम तो करतो. ऑफिसमध्ये इतर लोक काम करत असतील त्यावेळी तो आपल्या बॉसकडे जातो आणि आपल्या सहकार्यांच्या विरोधात त्याचे कान भरण्याचे काम करतो. तो तेथे जाऊन म्हणतो, ‘सर, काल अमित काहीसा हैराण असल्यासारखा दिसत होता.' त्यावर त्याच्या बॉसने कारण विचारल्यावर तो सांगतो की मीदेखील त्याला तसं विचारलं त्यावेळी त्याला अमुक एक समस्या असल्याचं लक्षात आलं, असं उत्तर तो देतो. त्यापुढे जाऊन तो म्हणतो, ‘सर, त्याच्याबाबतीत बर्या्च समस्या आहेत. त्यामुळेच तोप्रत्येकाशी उलट-सुलट बोलत असतो. आता कालचंच सांगायचं तर काल त्याने तुमच्या विरोधात अमुक एक गोष्ट इतरांना सांगितली. मी खोटं बोलत असेन तर मला नोकरीतून काढून टाका. मी त्यावेळी गप्प बसलो नाही त्यावेळी तो गप्प बसला.'
 
ही गोष्ट अमितला कळली त्यावेळी त्याने सुजयला त्याचं कारण विचारलं. त्यावेळी सुजयने आपला पवित्रा बदलला. ‘अरे, मी तुझ्याविषयी असं कसं बोलू शकेन' असं तो म्हणाला. असं बोलल्यानंतर आपला विचित्र परिस्थितीतून बचाव झाला असं सुजयला वाटतं. पण, अशा स्थितीचा त्याला वारंवार सामना करावा लागणार आहे. याचं कारण त्याची ही सवय इतक्या सहजपणे सुटणारी नाही. त्यामुळे तो वारंवार तसंच करत राहणार आणि एखाद्या दिवशी सर्व लोक त्याला घेरतील तेव्हा तो स्वतःचा बचाव करु शकणार नाही. या धोकादायक सवयीला आपण बोलघेवडेपणा म्हणतो.
 
अशा प्रकारे अनेक लोकांना मुख्य काम करण्याऐवजी अशी कामं करण्यातच मौज येते. असे लोक फारसे यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण, त्यांचा खोटारडेपणा कधी ना कधी उघडकीला येतोच. अशा सवयी हादेखील एक प्रकारचा आजार आहे आणि तो संसर्गजन्य असतो. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणंच चांगलं. आपल्या ऑफिसमध्येही अशी सवय असणारे लोक असतील तर त्यांच्यापासून दूर राहा. एखाद्याने दुसर्यााविषयी काही वाईट गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्या जागेवरुन त्वरित दूर जावं किंवा त्या माणसाला थांबवावं.
 
 विधिषा देशपांडे 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

यवतमाळच्या बोरगाव धरणावर सहलीसाठी गेलेल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी सेल्फी काढताना बुडाल्या

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

पुढील लेख
Show comments