Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

Published: मंगळवार, 7 मे 2024 (12:09 IST)
नेहमी तर्क करणारा विचार धारदार चाकू समान आहे जो वापरणार्‍याच्या हातातून रक्त काढतोचं.
 
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.
 
जे चांगले आहे ते काही एकट्यानेच येत नाही ते सर्व मंगल गोष्टी सोबत घेवून येते.
 
चंद्र आपला प्रकाश संपूर्ण आकाशात पसरवतो परंतू कलंक स्वत:जवळ ठेवतो.
 
जेव्हा आम्ही नम्रते मध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.
 
जो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातली दु:ख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.
 
फक्त प्रेमच वास्तविकता असते, ती केवळ भावना नसते. हे एक परम सत्य आहे जे सृष्टीच्या हृदयात राहतं.
 
मानवी जीवन नितीनिरपेक्ष कधीच असू शकत नाही त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.
 
ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आश्रय स्थान घरटे असते, त्याचप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रय स्थान मौन असते.
 
आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.
 
थोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.
 
निर्भीड नव जीवनाच्या दिशेने चला.
 
विश्वास हा असा पक्षी आहे कि, जो उष:कालापुर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो.
 
एखाद्या मुलाचे शिक्षण आपल्या ज्ञानापुरते मर्यादित ठेवू नका कारण त्याचा जन्म दुसर्‍या वेळी झाला आहे.
 
परमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळ वाऱ्यात होत नसून ते वाऱ्याच्या झुळके च होते.
 
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
 
पात्रातील पाणी नेहमी चमकत असते आणि समुद्राचे पाणी नेहमीच गडद असते. लघु सत्याचे शब्द नेहमीच स्पष्ट असतात, महान सत्य मौन असतं.
 
पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळा ना ऱ्या पायाला आपण सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षेमेचे हेच कारण आहे.
 
प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा तो स्वर्गाचे फुल बनवतो.
 
प्रांतीय आणि जातीय भावना मनात आणू न देता व्यक्ती व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा आणि आपण सगळे एक आहोत हीच भावना मनात बाळगावयास हवी.
 
फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अनुभवता येत नाही.
 
महत्त्वाकांक्षेच्या लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाही.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments