Marathi Biodata Maker

Vinoba Bhave death anniversary व्यक्ति‍विशेष : विनोबा भावे

बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (09:29 IST)
Vinoba Bhave death anniversary विनोबा भावे यांचा जन्म महाराष्ट्रातील कुलाबा (आता रायगड) जिल्ह्यातील गागोडे गावात 11 सप्टेंबर 1895 रोजी एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी शंभूराव आणि आईचे नाव रुक्मणी होते. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा खोलवर प्रभाव होता. भगवद्गीता, महाभारत आणि रामायण यांसारख्या धार्मिक ग्रंथांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
 
विनोबा भावे म्हणाले की, त्यांना गांधीजींमध्ये हिमालयातील शांतता आणि बंगालचा क्रांतिकारी आवेश दिसतो. गांधीजींनी विनोबा भावे यांना त्यांचे विचार चांगले समजले, असे म्हणत त्यांचे कौतुक केले होते. गांधीजींनी 1940  मध्ये ब्रिटिश सरकारच्या युद्ध धोरणाविरुद्ध राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी विनोबा भावे यांची निवड केली होती.
 
थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांचा आज जन्म‍दिन. कोकणातील रायगड जिल्ह्यात गागोदे या पेण तालुक्यातील गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी विनायक नरहर भावे यांचा जन्म झाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट 7 जून 1916 रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले.
 
त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पातंलजोगाचे शिक्षण घेतले. पुढे 1921मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून 8 एप्रिल 1921 रोजी महात्माजींच्या 1940 त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते. 1951 ते 53 हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढलेल्या विनोबांनी 15 नोव्हेंबर 1982 रोजी तेथेच आपली देहयात्रा संपविली. सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

१७ वर्षीय विद्यार्थ्या कडून सीबीएसई बोर्डाची अनियमितता उघडकीस, सचिव अध्यक्षांचा पायउतार

मान्सूनपूर्वी शेतकऱ्यांनी करावीत ही 7 महत्त्वाची कामे; अन्यथा होऊ शकते नुकसान

नवीन टाटा टियागो ईव्ही फक्त ₹६.९९ लाखां मध्ये, घरी बसल्या ऑर्डर करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

अहमदाबाद पोलिसांनी १०० हून अधिक बांगलादेशींना अटक केली

गोळीबारनंतर खान सरांचे कोचिंग सेंटर बंद, संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुढील लेख
Show comments