Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी भाषा गौरव दिन कविता व लघुकथा विधेद्वारे साजरा

Updated: शुक्रवार, 3 मार्च 2023 (14:58 IST)
 
आपली मातृभाषा काहीही प्रयत्न न करता आपल्याला फुलवते जगाशी जोडते. आपल्या भाषेचा गौरव म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेला मानाचा मुजरा दिला गेला.
 
सर्वप्रथम श्री गणपती आणि सरस्वती देवीचे वंदन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय चितळे, प्रमुख पाहुणे श्री अश्विन खरे संपादक श्री सर्वोत्तम मासिक, श्री अरविंद जावळेकर वरिष्ठ साहित्यकार आणि सौ अंतरा करवडे लेखिका व अनुवादक असे होते. सौ. सुहास चंद्वासकर यांनी स्वागत भाषण व अतिथी  परिचय दिले. पाहुणे आणि कविवृंदांचे स्वागत लोकमान्य शिक्षा समिती चे डॉ. विवेक कापरे, श्री बंडू वैशंपायन, श्री नांदेडकर, सौ सोनल जोशी, सौ. प्रीती कापरे, सौ विद्या नांदेडकर आणि इतर मंडळींनी केले. त्या नंतर सौ. उषाताई वैशंपायन आणि श्री विश्वनाथ शिरढोणकर यांचे नवीन पुस्तक प्रकाशन प्रकाशासाठी सन्मान केला गेला त्याच प्रकारे लोकमान्य नगर निवासी मंडळ तर्फे कर्तृत्ववान अध्यक्ष श्री वैभव ठाकूर यांचा ही सन्मान केला.
कार्यक्रमाच्या पहिल्या अंकात वृहद कवी संमेलन आणि दुसऱ्या अंकात लघुकथा अभिवाचन झाले. कवी संमेलनात वृषाली ठाकूर, वैजयंती दाते, वैशाली पिंगळे, सुषमा अवधूत, अलका टोके, ज्ञानेश्वर तिखे, विश्वनाथ शिरढोणकर, सुभेदार साहेब, अरुणाताई खरगोनकर, मंजुषा पांडे, अर्चना पंडित, मनीष खरगोनकर यांनी वेगवेगळ्या विषयावर दर्जेदार काव्य पाठ केले. कवी संमेलनाचे यशस्वी सूत्रसंचालन डॉक्टर मनीष खरगोनकर यांनी केले.
 
मराठी भाषेत लघुकथा विधाची ओळख करून त्या विधेला मराठी भाषेत लोकप्रिय करण्याचे यश मध्यप्रदेशातील इंदूर शहरालाच आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या अंकात भाषेवर केंद्रित लघुकथा वाचन अंतरा करवडे आणि डॉ. वसुधा गाडगीळ यांनी भाषेवर केंद्रित लघुकथांचे वाचन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अश्विन खरे यांनी आपल्या भाषणाने शुभेच्छा दिल्या आणि अध्यक्ष श्री विजय चितळे यांनी मराठी गझल सादर केली. आभार प्रदर्शन सुहास चंद्वासकर यांनी केले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

UPI वापरणाऱ्या युजर्सला मोठा धक्का, वाचा

LIVE: मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा! सोशल मीडियावरील दाव्यानंतर पोलीस सतर्क

महाराष्ट्रात एसआयआरच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाणून घ्या

लाल समुद्रात भारतीय मालवाहू जहाजा बुडाले, १३ भारतीय खलाशी सुरक्षित

मुंबई उच्च न्यायालयाने नितीन गडकरी यांच्यावरील एआय-डीपफेक पोस्ट हटवण्याचे आदेश दिले, तसेच एक्स, मेटा आणि गूगलला फटकारले

पुढील लेख
Show comments