Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोजागिरी पौर्णिमा 2023 खंडग्रास चंद्रग्रहण

Updated: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (17:27 IST)
 
28 ऑक्टोबरच्या रात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण भारताच्या अनेक भागात दिसणार आहे. या दिवशी शरद पौर्णिमा असेल. हे चंद्रग्रहण पहाटे 1.05 वाजता सुरू होऊन पहाटे 02.23 वाजता संपेल. अशा प्रकारे हे ग्रहण सुमारे 1 तास 19 मिनिटे चालेल. हे चंद्रग्रहण भारतात तसेच युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण आफ्रिका, आर्क्टिक, अंटार्क्टिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरासह आशियातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे.
 
खंडग्रास चंद्रग्रहण वेळ
स्पर्श रात्री 1.05
मध्य रात्री 1.44
मोक्ष 2.23
पर्वकाल 1 तास 18 मिनिटे
 
वेधारंभ - दुपारी 3 वाजून 10 मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप, श्राद्ध कर्मे करता येतील.
 
वेधकाळात भोजन निषिद्ध आहे म्हणून अन्न ग्रहण करु नये.
वेधकाळात इतर आवश्यक कार्ये जसे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप ही कर्मे करता येतात.
बाल, आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी रात्री 7 वाजून 40‍ मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळावेत.
ग्रहण पर्वकाळात म्हणजे रात्री 1.05 ते पहाटे 2.13 मात्र पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोपणे ही कामे देखील करु नयेत.
 
ग्रहणात काय करावे - ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे.
 
ग्रहणाचे राशींवर प्रभाव -
शुभफल : मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ
मिश्रफल : सिंह, तूळ, धनू, मीन
अशुभ फल : मेष, वृषभ, कन्या आणि मकर

सर्व पहा

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

श्रावण स्पेशल: कांदा-लसूण न वापरता बनवा ५ झटपट पदार्थ

हनुमानजींची पूजा संध्याकाळी करावी हे खरे आहे का? जाणून घ्या शास्त्र आणि लोकश्रद्धा काय सांगते

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments