Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्री उशिरा जेवता?

Updated: शनिवार, 9 जून 2018 (14:22 IST)
 
चयापयच क्रियेवर परिणाम- चयापचय क्रिया वेगवान असेल तर शरीरातील चरबी वेगाने जळून आपण सडपातळ राहू शकतो. मंद वेग असलेल्या चयापचय क्रियेच्या व्यक्तींध्ये चरबीचे ज्वलन होण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे काही व्यक्ती जाड होतात. रात्री उशिरा जेवल्यामुळे जास्त कॅलरीज पोटात जाऊन आपली झोप पूर्ण होत नाही. परिणामी आपले वजन वाढते.
 
स्थूलता वाढते : रात्री उशिरा भूक लागल्यावर बर्‍याचदा हवे ते खाल्ले जाते. त्यावेळी वजन वाढेल याचा विचार केला जात नाही. यामुळे चयापचयाच्या वेगात बदल होतो. दिवसा जेवतो, तेव्हा शरीराची काही ना काही हालचाल होत राहाते. पणरात्री झोपताना चयपचयाचा वेग कमी होतो. त्यामुळे रात्री उशिरा आपण जे काही खाऊ ते अत्यंत कमी वेगाने पचते आणि त्यामुळे वजन वाढते.
 
पित्तप्रकोप : रात्री उशिरा जेवल्यास पित्तप्रकोप किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. छातीत जळजळ होते. खूप रात्री जेवल्यास त्याचे पचन योग्यप्रकारे होत नाही आणि अन्न पचण्यासाठी आवश्यक आम्ल पुन्हा अन्ननलिकेत जाते. त्यामुळे अपचन होते. सातत्याने हे होत राहिल्यास गरगरणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्‌भवतात.
 
उच्च रक्तदाब : रात्री उशिरा जेवल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाच्या आजाराला आमंत्रण मिळते. म्हणूनच रात्रीच्या जेवणाची वेळ सांभाळणे गरजेचे आहे.
 
रात्री उशिरा जेवल्याने झोपेशी निगडित समस्याही निर्माण होतात. रात्री उशिरा जेवणार्‍या लोकांमध्ये चिडचिडेपणावाढू शकतो.
 
डॉ. योगेश चौधरी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात होणारा सर्दी-ताप टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 10 सवयी

श्रावण महिन्यात उपवास करत असाल, तर ही तीन योगासने करायला विसरू नका

पौराणिक कथा : अशाप्रकारे हनुमानजी आकाशात उडायला शिकले

महिलांनी दरवर्षी कराव्यात या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या; गंभीर आजारांपासून राहाल एक पाऊल पुढे

Hoonemoon Phase लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही 'हनीमून फेज' टिकू शकते का? न्यूरोसायन्सने दिले उत्तर!

पुढील लेख
Show comments