Dharma Sangrah

उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिय दिनचर्या

रविवार, 5 मार्च 2023 (22:39 IST)
उन्हाळ्यात पहाटे माठातील पाण्याचे सेवन करावे. फ्रिजचे पाणी पिऊ नये. यानंतर फिरायला जावे, कपाळावर घाम येईपर्यंत व्यायाम करावा. 
 
काळी माती हे एक श्रेष्ठ रसायन आणि बहुगुणी आहे. त्यात पाणी घालून त्याचा लेप लावावा. नंतर अंग धुऊन घ्यावे किंवा अंगास हळद पावडर, तीळ आणि आवळकाठी पावडर दूध मिश्रीत लेपाने लावावे, नंतर गार पाण्याने स्वच्छ स्नान केल्याने रंध्रे मोकळी होतात. यामुळे शरीर हलके आणि निरोगी बनते.
 
तेलकट आणि तुपकट पदार्थ तसेच टाळावे तसेच शिळे अन्न, मद्य, मांसाहार सर्वथा टाळावा. याऐवजी मोड आलेले चणे, मूग, मेथ्या, द्विदल धान्याच्या उसळी किंचीत चटकदार लावून खाल्ल्याने आरोग्याचे संवर्धन होते.  
 
भाकरी, पोळी, कोबी, लाल टोमॅटो, कच्ची कोशिंबीर, ताक, जेवणाच्या शेवटी दही, आंब्याची किंवा चिंचेची चटणी असा आहार असावा. अशा आहारात पाणी पिण्याची गरज पडत नाही. कारण या सर्व पदार्थांत जलतत्त्व भरपूर असते. आमरसही घ्यावा.  
 
रात्री पोळी भाजी, कच्ची कोशिंबीर, भात आणि मूगडाळीचे वरण, असा ताजा आणि गरम आहार घ्यावा. उन्हाळा हा तसा शरीर निरोगी ठेवण्याचा काळ आहे,हे लक्षात घ्यावे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

अंगातून घामाचा वास घालवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाका

मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गुठळ्या तयार होतात? दुर्लक्ष करू नका

पावसाळ्यात आजारपण टाळण्यासाठी या योगासनांचा सराव करा

प्रेरणादायी कथा : सफरचंदाचे झाड; बालपण, तारुण्य ते वृद्धापकाळाचा प्रवास

जोडीदारांमधील वयाचे अंतर किती असावे? जोडीदार निवडताना वयाचा 'हा' रुल नक्की माहीत असावा!

पुढील लेख
Show comments