Marathi Biodata Maker

आरोग्यदायी मीठपाणी

मिठाच्या पाण्याने मलाशयाची स्वच्छता होते. त्यासाठी आपल्याला रोज सकाळी पाण्यामध्ये मीठ घालून प्यायचे आहे. हा उपाय केल्यास आरोग्यासाठी हानीकारक आजार जसे मधुमेह आणि स्थूलपणा यांच्यापासून बचाव करू शकता. फक्त मधुमेहच नव्हे तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपण वाचू शकतो. मात्र हे पाणी पिताना ते स्वयंपाकघरात पिऊ नका. काळ्या ठिाचे म्हणजेच सैंधव मिठामध्ये असलेली 80 हून जास्त खनिजे शरीर आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात. कसे तयार करायचे हे पाणी पाहूया.
 
एक ग्लास कोमट पाण्यात एक छोटा चमचा काळे मीठ घालून ते चांगले विरघळवून घ्यावे. हे पाणी गुणकारी पेय आहे. याचे सेवन केल्याने आरोग्यवर्धक फायदे होतील. ह्या पाणचे फायदे पाहूया.
 
त्वचेच्या समस्या- या पाण्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतील. त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या, डागांपासून सुटका होईल. कारण मिठाच्या पाण्यात क्रेमिया असते, ज्यामुळे त्वचा रोगांशी लढून त्वचा उजळते.
 
पचन तंत्र- मीठ-पाण्यामुळे तोंडातील लाळनिर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. त्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि प्रथिने पचवण्याचे काम करतात. त्यांना पचवण्यास लाळेची मदत होते. त्याशिवाय पोटातील यकृत, आतडे यांच्यामध्ये अन्न पचनास आवश्यक एन्झाईम्स निर्माण होतात.
 
नैसर्गिक जीवाणूविरोधी- मीठ-पाण्यात अनेक खनिजे असतातच पण हे मीठ पाणी नैसर्गिक जीवाणूविरोधी घटक म्हणून काम करते. शरीरातील जीवघेण्या आजार पसरवणार्‍या जीवाणूंना मारण्याचे काम ते करते आणि आरोग्य चांगले राहाते. 
 
हाडांची मजबुती- वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्या शरीरातील खनिजे आणि कॅल्शिअम कमी होत जाते आणि हाडे कमजोर होऊ लागतात. त्यामुळे हाडे तुटूही शकतात. अशा परिस्थितीत मीठ पाणी प्यायल्याने हाडातील खनिजांची पूर्तता होऊन हाडे मजबूत होतात. त्यासाठी रोज नियमितपणे ह्या पाण्याचे सेवन करावे.
 
स्नायूंची मजबूती - काळे मीठ कोमट पाण्यात मिसळून रोज प्यायल्यास शरीरातील पोटॅशिअम कमी होते. त्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि आरोग्य लाभते.
 
वजन घटते -कोमट पाण्यात काळे मीठ घालून प्यायल्यास शरीरातील अतिर्रित चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे स्थूलपणा दूर होतो. त्याशिवाय शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी घटते. त्यामुळे मधुमेहासारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता कमी होते.
 
डीटॉक्सिफिकेशन - शरीरातंर्गत विषद्रव्ये काढण्यासाठी उपयुक्त असते. विषद्रव्ये बाहेर पडल्याने अवयवांना नुकसान होत नाही.
 
शरीरातील पाण्याचे प्रमाण- शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहाते. आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो. तसेच त्वचेची लवचिकता वाढते आणि त्वचा सदोदित मऊ मुलायम राहते.
 
यकृताच्या समस्या - या पाण्यामुळे यकृताची हानी भरून निघते. यकृताच्या खराब झालेल्या पेशी चांगल्या होतात. त्यामुळे यकृताच्या सिर्‍होसिससारखी समस्या बरी होण्यास मदत होते.
 
झोप लागण्यास मदत - रक्तातील कार्टिसोल, अ‍ॅड्रिनल वाढण्यास ठिामुळे मदत होते. ही सर्व हार्मोन्स तणावाशी निगडित आहेत. ह्या हार्मोन्सचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्यास झोप चांगली लागते. अनिद्रेची समस्या असल्यास काळे मीठ घातलेले पाणी प्यावे.
 
डॉ. रोहिणी भगत

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

ठाणे महानगरपालिकेत 381 जागांसाठी महाभरती सुरू! ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Thank You Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार संदेश

Olympiad 2026: भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी! फिजिक्स, बायोलॉजी अन् केमिस्ट्रीत पटकावली पदके

High Protein Recipes for Kids मुलांसाठी ४ चविष्ट आणि उच्च प्रथिनयुक्त पाककृती

पुढील लेख
Show comments