Marathi Biodata Maker

प्रेरणादायी कथा : आचरण महत्वाचे की ज्ञान?

सोमवार, 31 मार्च 2025 (20:30 IST)
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका राजाच्या दरबारात एक ज्ञानी आणि आदरणीय राजपुरोहित होता. तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा राजाही उभा राहून त्याचे स्वागत करायचा. एके दिवशी राजाने त्याच्या दरबारींना एक प्रश्न विचारला: कोणते जास्त महत्त्वाचे आहे - आचरण की ज्ञान? तेव्हा राजपुरोहित म्हणाले हा प्रश्न सोडवण्यासाठी काही वेळ लागेल.
ALSO READ: प्रेरणादायी कथा : आईचा महिमा
राजपुरोहितने एक प्रयोग करून पाहिला आणि तिजोरीतून दोन मोती चोरले. एका सेवकाने ते पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशीही तेच घडले. राजपुरोहितने पुन्हा रत्ने चोरली. हे प्रकरण राजापर्यंत पोहोचले आणि राजाने चौकशीचे आदेश दिले आणि राजपुरोहितचे सत्य बाहेर आले. आता दुसऱ्या दिवशी राजाने राजपुरोहितचा सन्मान केला नाही. त्याच्या सन्मानार्थ उभे राहिले नाही. राजपुरोहित स्वतःशी म्हणाला: औषधाने काम केले. आता मात्र राजाने राजपुरोहितला विचारले की तुम्ही मोती आणि रत्ने चोरीले आहे का? हो, राजपुरोहित म्हणाला. राजाने विचारले का? तेव्हा राजपुरोहित म्हणाले की, खरंतर मला तुम्हाला दाखवायचे होते की आचार मोठा की ज्ञान? राज्यसभेत मला जी प्रतिष्ठा, आदर आणि सन्मान आहे, तो आचरणामुळे आहे की ज्ञानामुळे? तुम्ही पाहिले की माझे ज्ञान माझ्यासोबत होते, त्यात कोणताही बदल नव्हता, त्यात कोणतीही घट नव्हती. तरीही, तुम्ही माझे स्वागत केले नाही. उभे राहून माझा सन्मान केला नाही. कारण मी माझ्या आचरणापासून पतन पावलो होतो, राजपुरोहित पासून मी आता  चोर झालो होतो. माझे वर्तन बिघडले होते, राजपुरोहित पासून मी चोर झालो होतो. माझे वागणे बदलले, आता मात्र राजाला समजले की आचरण जास्त महत्वाचे आहे की ज्ञान?, तसेच राजपुरोहित राजाला म्हणाले की, मला वाटतं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तरही आहे. अश्या प्रकारे राजाला समजले की, आचरण महत्वाचे असते. राजाला राजपुरोहितचे कौतुक वाटले. 
तात्पर्य : आपल्याला ज्ञान किती आहे यापेक्षा आपले आचरण कसे असते याला महत्व आहे. 
ALSO READ: प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

जास्त प्रमाणात लिची खाणे धोकादायक ठरू शकते; खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

वय ४० उलटलेल्या पुरुषांनो सावधान! प्रोस्टेट कॅन्सरचा धोका का वाढतोय? ही ५ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नका

भानू सप्तमी दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिक आणि सात्त्विक नैवेद्य पाककृती

सोप्या घरगुती टिप्स: घरात कीटक नियंत्रण (Pest Control) कसे करावे ?

शिवराज्याभिषेक दिन भाषण Shivrajyabhishek Sohala Speech 2026

पुढील लेख
Show comments