Marathi Biodata Maker

कोणाच्या दिसण्यावर कधीही टीका करू नका, गुणांवर लक्ष केंद्रित करा

बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (17:28 IST)
आचार्य चाणक्य खूप विचारपूर्वक उत्तर देत असत. एके दिवशी राजा चंद्रगुप्त मौर्य, महामंत्री चाणक्य आणि महाराणी कोणत्यातरी विषयावर बोलत होते. बोलत असताना राजा चंद्रगुप्त चाणक्याला म्हणाले, 'तुमचा रंग काळा आहे, दुरून तुम्ही कुरूप दिसता, पण तूम्ही किती प्रतिभावान आहात. तुम्ही देखणे असता तर खूप छान झाले असते. देवानेही चूक कशी केली.
 
'हे बोलणे राणीला आवडले नाही तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, हे रूप ज्यावर सर्वजण मोहित होतात ते क्षणिक आहे.

राजा म्हणाले, 'राणी साहेबा आपण स्वतः खूप सुंदर आहात तरी दिसण्याला महत्त्व देत नाहीस. असेच एक उदाहरण द्या, ज्यात रूपापेक्षा गुणांचे महत्त्व जास्त दिसते.
 
'याचे उत्तर चाणक्याने दिले. ते राजाला म्हणाले, 'पाणी प्या.' चाणक्याने दोन ग्लास भरून राजाला पाणी दिले.
 
चाणक्य म्हणाले, 'मी तुला दिलेला पहिला ग्लास सोन्याच्या सुंदर भांड्यातून भरला होता. दुसरा ग्लास काळ्या मातीच्या भांड्यातून भरला होता. कोणतं पाणी अधिक चांगलं होतं? ते सांगा.
'राजा म्हणाले, 'मातीच्या मडक्यातील पाण्याची चव चांगली आहे.'
 
चाणक्य म्हणाले, मातीच्या भांड्यातल्या पाण्यातून समाधान मिळते. त्याचप्रमाणे रूप हे सोन्याच्या घागरीसारखे आहे आणि गुण मातीच्या भांड्यासारखे आहेत. सद्गुणातून समाधान मिळते आणि रूप अस्पष्ट राहते.'
 
धडा - चाणक्याची ही चर्चा आजही आपल्यासाठी खूप उपयोगी आहे. कोणाच्या दिसण्यावर कधीही टीका करू नका. जर कोणी खूप सुंदर असेल तर त्याच्यावर जास्त प्रभावित होऊ नका आणि जर कोणी दिसायला सुंदर नसेल तर त्याच्यापासून दूर पळू नका. सर्व प्रथम, लोकांच्या गुणांकडे लक्ष दिले पाहिजे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या वॉर्डरोबमध्ये करा 'हे' ५ बदल; दिसा नेहमीपेक्षा स्टायलिश!

उन्हाळा संपताना 'हा' आजार वाढतोय; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे घरगुती उपाय

ऑफिस आणि घर सांभाळताना होणारी चिडचिड? महिलांनो, ‘या’ ५ सवयींनी मिळवा मानसिक शांतता

अकबर-बिरबलची कहाणी : कापूस चोर

हिल स्टेशन फिरायला जाताय मग प्रवासासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात

पुढील लेख
Show comments