Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Touching Truth भिंती पलीकडचं नातं

Updated: सोमवार, 18 मे 2026 (14:54 IST)
गप्पा रंगायच्या…
हसणं यायचं…
कधी एखादीच्या डोळ्यात पाणीही यायचं…
पण ती एकटी कधीच नसायची…
“काळजी करू नको गं… सगळं ठीक होईल…”
हे वाक्य त्या काळी औषधासारखं होतं…
एखाद्या घरात पाहुणे आले की भांडी शेजारातून यायची…
सण आला की फराळ एका घरात बनून चार घरांत वाटला जायचा…
आणि एखादी बाई आजारी पडली की तिच्या मुलांना दुसऱ्या घरात जेवायला बसवलं जायचं…
रक्ताची नाती नसली तरी माणुसकीची नाती खूप घट्ट होती…
आज आठवतं…
आई कधी कधी शेजारच्या काकूशी भिंतीवरून तासन् तास बोलायची…
विषय काही विशेष नसायचा…
पण मन हलकं व्हायचं…
त्या काळी “मेंटल हेल्थ” हा शब्द माहिती नव्हता…
पण माणसं एकमेकांना ऐकून घ्यायची…
म्हणून कदाचित मन इतकी तुटत नव्हती…
आता सगळं बदललं…
मोठमोठे फ्लॅट आले…
दरवाजांवर डिजिटल लॉक आले…
पण माणसांच्या मनांवरही कुलूप पडलं…
आज शेजारी कोण राहतं हे माहिती नसतं…
आणि माहिती असलं तरी संवाद फक्त
“पार्सल आलंय…”
किंवा
“गाडी बाजूला घ्या…”
इथपर्यंतच राहतो…
पूर्वी घरं छोटी होती…
पण मनं मोठी होती…
आता घरं मोठी झाली…
पण माणूस आतून एकटा होत चाललाय…
मोबाईलमध्ये हजारो contacts आहेत…
सोशल मीडियावर शेकडो लोक जोडलेले आहेत…
पण मनापासून विचारणारं —
“काय गं… ठीक आहेस ना?”
हे विचारणारं माणूस मात्र कमी झालंय…
किती साधं आणि सुंदर होतं ना ते जगणं…
ना मोबाईल…
ना स्टेटस…
ना “ऑनलाईन” असण्याची धडपड…
पण तरीही माणसं एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित होती…
खऱ्या अर्थाने…
कधी कधी खरंच वाटतं…
पुन्हा एकदा असं जुनं जगणं मिळावं…
एखादं छोटंसं घर असावं…
बाहेर अंगण असावं…
आणि मध्ये अशीच एक भिंत…
जिथे आपण मन मोकळं करावं…
हसावं…
रडावं…
आठवणी सांगाव्यात…
आणि समोरून कोणीतरी फक्त प्रेमाने विचारावं —
“काय गं… ठीक आहेस ना?” 

- सोशल मीडिया
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नैतिक कथा : म्हातारे गाढव आणि शेतकऱ्याची गोष्ट

पावसाळ्यात कोणत्या जीन्स वापराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा

पावसाळ्यात गोड आणि रसरशीत नासपती फळ खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

पावसाळ्यात फरशी पुसतांना पाण्यात हे नैसर्गिक घटक मिसळा; कीटक निघून जातील

पुढील लेख
Show comments