Marathi Biodata Maker

संघटितपणाचे महत्त्व

सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (15:18 IST)
एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्‌-कदा चालणार्‍या भांडणामुंळे तो दुःखी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घड्यावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्राणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.
 
वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता आली नाही. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, 'बघितलंत ना? एकीचे बळ किती असते ते?' वडील एवढेच बोलले तवर ते सुज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने ते वागूलागले. 
 
तार्त्प : एकीचे बळ मोठे असते. भावाभावांनी एकोप्याने राहिलस त्यांचे सामर्थ्य वाढते.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

"केवळ स्वादिष्टच नाही, तर ती आरोग्यदायी फायद्यांचा खजिना: हिंग कचोरी"

भारतीयांचा आवडता नाश्ता, पण डॉक्टर का देतात टाळण्याचा सल्ला जाणून घ्या

पावसाळ्यात गुलाबाच्या रोपांना काळ्या ठिपक्यांच्या बुरशीपासून वाचवण्याचे प्रभावी उपाय

AI मुळे पुढील 5 वर्षांत सर्वाधिक मागणी असणाऱ्या 10 नोकऱ्या

पार्वती जयंती 2026: मुलींसाठी पार्वती देवीच्या नावावरून ठेवा ही 31 सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

पुढील लेख
Show comments