Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षक - समाजाचा आदर्श शिल्पकार

Updated: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (14:22 IST)
 
शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. राधाकृष्णन म्हणतात. 'The importnace of education is not only in knowlege and skill but it is to help us to live with other's आज माणूस एकेकापासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. या त्यांच्या विधानावरून 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या वचनाची प्रचिती येते. त्यांनी, शिक्षकत्वाच्या आदर्शाचा राजपथ तयार केला आहे. प्रत्येक शिक्षकान खर्‍या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ आणि उद्यमशील भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे. 
 
'शिक्षक-दिन' दिवस साजरा करायचा म्हणजे बाकीच्या दिवसाला शिक्षकासह समाजातल्या सर्व घटकांनी त्यांना व त्यांच्या कार्याला 'विस्मृत' करायचे नाही. त्यांच्या गुणांचा आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे. सर्व शिक्षक-प्राध्यापकांचे आदर्श, भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मानवतावादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक, श्रोतंना मंत्रमुग्ध करणारे कुशल वक्ते, राजकारण, समाजकारण व धर्मकारण यांचे समन्वयक, भारताची प्रतिमा विदेशात उंचावणारे थोर तत्त्वचिंतक अशा विविधांगी व्यक्मित्वाचे धनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आम्हा शिक्षकांसमोर उत्तुंग प्रेरणादायी आदर्श व्यक्मित्व आहे.
 
वर्तमान काळात 'शिक्षक' हे केवळ अध्यापनकर्ता न राहता ते 'मार्गदर्शक', समुपदेशक देखील आहेत. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जितके विनयशील, संपन्न, व्यासंगी तितका परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रेरणेवर होत असतो म्हणून तत्त्वज्ञान कितीही बदलले अध्ययन, अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल झाला तरी संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही. 
 
'गुरुचा असावा ध्यास। प्रश्नांची व्हावी रास।
 
मग यश मिळेल हमखास॥' असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 'शिक्षक' हा कामगार नाही. तो 'शिल्पकार' आहे, कलावंत आहे. पालकत्वाची जबाबदारी तो पेलत असतो. आपला 'पाल्य' यशस्वी झाल्यावर शिक्षकांना त्याचे श्रेय देण्यास तो तयार आहे. आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञान-निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, सहकार्य, समाजाभिमुखता, साहस या गुणांनी युक्त  व्यक्तिमत्तवाची नितांत आवश्यकता देशाला व समाजाला आहे.
 
अशी व्यक्तिमत्वे घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. माणूस आयुष्यभर अनेक गोष्टी शिकत असतो. 'जो-जो ज्याचा घेतला गुण। तो तो गुरु म्या केला जाण।' हे ओळखून प्रत्येक गुरुंविषयी  /शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.
 
विद्यार्थी जसा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये तसा, शिक्षकही निव्वळ 'अर्थार्जनाचे' साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहणारे असता कामा नये. 'शिक्षक' असण्याची पहिली अट 'विद्यार्थी' असणे हीच आहे. 'शिक्षक' केवळ 'पोपटपंची' करणारा, प्रश्नांना वावच न देणारा असेल तर अर्थपूर्ण ज्ञान-व्यवहार संभवणार नाही. शिक्षक-विद्यार्थी परस्परपूरक असावेत. 'चांगला' शिक्षक विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतो. माहिती तंत्रज्ञानाचा 'विस्फोट' झालेल्या काळात विद्यार्थी पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकांवर अवलंबून राहिलेला नाही. माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयापासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. त्या साधनांची योग्य ती 'दिशा' त्यांना खुली करून द्यावी लागेल. विद्यार्थी त्यामुळे भटकणार नाही. 'माहिती-व्यवस्थापन' करत 'कुतूहल' व 'जिज्ञासा' जागृत करण्याचे काम शिक्षकांचे आहे. झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत द्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी  दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे. 
 
शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण, जीवघेणी स्पर्धा, अध्यपन-अनुसंधानाविषयी सरकार व शिक्षकांची उदासीनता अशा अत्यंत विचित्र परिस्थितीत डॉ. राधाकृष्णन यांचा 'जन्मदिन' साजरा करताना तो केवळ शिक्षकांचे स्तुतिपर कार्यक्रम, परंपरा, रिवाज म्हणून न करता शिक्षक, समाज, राज्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी, जबाबदार पालकांनी अंतर्मुख होऊन नवीपिढी, नवा देश घडविताना आपण आपल्या कर्तव्याचे पालन कितपत प्रामाणिकपणे करत आहोत, हे स्वतःला विचारले पाहिजे. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याला रोजगार मिळावा, मूलभूत नागरी व वैयक्तिक मूल्ये विकसित व्हावीत. म्हणून आजच्या 'शिक्षक-दिनी' आपणाला संस्कारमय बनविलेल्या सेवेतील व्रतस्थ महान शिक्षकांना विनयांजली अर्पण करून, त्यांच्याप्रमाणे आपणही आयुष्याचे सार्थक करू या, हीच आजच्या शिक्षक दिनी प्रार्थना!
 
प्रा. चेतन तुपकर 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शेतकरी अपघात संरक्षण योजनेला ३ वर्षांची मुदतवाढ दिली

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात संरक्षण योजनेला ३ वर्षांसाठी मुदतवाढ दिली

UPI MDR Charges: २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यावसायिक व्यवहारांवर शुल्क आकारले जाऊ शकते, विधेयक संसदेत सादर

पुण्यात महिलेचे नवजात बाळाच्या तोंडात प्राणघातक फेव्हिक्विक घालून अमानुष कृत्य

महाराष्ट्रातील रेजिडेंट डॉक्टर ५ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी संपावर; सरकारी रुग्णालयांमधील OPD बंद राहणार

पुढील लेख
Show comments